शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

औट्रम घाटातील योग्य पर्यायाची निवड ‘एनएचएआय’चे दिल्लीतील मुख्य कार्यालय करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 11:22 IST

सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीने सुचविले तीन पर्याय

छत्रपती संभाजीनगर : कन्नड ते चाळीसगाव दरम्यानच्या औट्रम घाटातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने सविस्तर प्रकल्प अहवाल सल्लागार समितीने सुचविलेल्या तीन पर्यायी मार्गापैकी योग्य पर्यायाची निवड ‘एनएचएआय’च्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयातर्फे करण्यात येणार असल्याचे निवेदन गुरुवारी (दि.१८) खंडपीठात करण्यात आले.

समितीतर्फे प्राधिकरणाकडे ३० मार्च २०२४ रोजी ‘फिजिबिलिटी’ अहवाल सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या जनहित याचिकेवर २० ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. पार्टी इन पर्सन याचिकाकर्ते ॲड. ज्ञानेश्वर बागुल यांनी वाहतूक कोंडीसंबंधी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी खंडपीठात सुरू आहे. संबंधित मार्गाला पर्याय सुचविण्यासंबंधी निवृत्त न्या. सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीने मार्गाची पाहणी केली आहे. ॲड. बागुल यांनी महामार्ग प्राधिकरणाने १० वर्षांत काहीच केले नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. ॲम्बर्ग सल्लागार समिती यापूर्वी नेमण्यात आली होती. संबंधित सल्लागार कंपनीने अहवाल द्यायला ३ वर्षे लावले होते. खंडपीठाच्या आदेशामुळे यावेळी ६ महिन्यांत अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्येक वेळी प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात येते. याचिकेवर दरमहा सुनावणी ठेवल्यास प्रकल्पाची प्रगती कळेल असेही ॲड. बागुल यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

एनएचएआयच्या वतीने ॲड. सुहास उरगुंडे यांनी युक्तिवाद केला की, सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीने सुचविलेल्या तीन पर्यायांचा अहवाल प्रथम एनएचएआयच्या नागपूर येथील कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. नागपूर कार्यालय एनएचएआयच्या नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालयाकडे अहवाल पाठवेल आणि संबंधित कार्यालय जमीन अधिग्रहण समितीकडे पडताळणीसाठी पाठवेल ,असे ॲड. उरगुंडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ