शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:38 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘विद्यार्थ्यांना दुष्काळ आला की फुकट खायची सवय लागते’ या कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र टीका आणि निषेध व्यक्त होत होता.

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषद : कुलगुरूंच्या वक्तव्यानंतर अखेर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा, माहिती लपवल्यावरून सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘विद्यार्थ्यांना दुष्काळ आला की फुकट खायची सवय लागते’ या कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र टीका आणि निषेध व्यक्त होत होता.बैठकीस कुलगुरू डॉ.चोपडे, प्रकुलगुरू डॉ़ अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ़ साधना पांडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ़ किशोर शितोळे, डॉ़ फुलचंद सलामपुरे, डॉ़ वाल्मीक सरवदे, संजय निंबाळकर, डॉ़ शंकर अंभोरे, डॉ़ राजेश करपे, डॉ़ नरेंद्र काळे, डॉ़ राहुल म्हस्के, डॉ़ वैशाली खापर्डे उपस्थित होते़ गेल्या काही दिवसांपासून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणाची व्यवस्था करण्याची मागणी होत होती. त्यासाठी विद्यापीठाने दहा लाख रुपयांची तरतूद करावी आणि उर्वरित रक्कम सामाजिक संस्थांकडून केली जाईल, अशी बाजू मांडण्यात आली होती. एकीकडे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनत असताना कुलगुरूंच्या वक्तव्याने सर्वत्र टीका केली जात होती. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर गंभीर चर्चा होण्याचे संकेत मिळाले होते. बैठकीत सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणाची परिस्थिती मांडली. अखेर सर्वांच्या एकमताने दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ निधीतून १० लाख रुपये खर्च करण्यासाठी मान्यता दिली. तीन ते चार महिने विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. बैठकीस डॉ. नरेंद्र काळे, डॉ. राजेश करपे, किशोर शितोळे, संजय निंबाळकर, डॉ. शंकर अंभोरे आदी उपस्थित होते.संशोधकांचा पेचपेट परीक्षा झाली. त्यावेळी एका-एका विषयासाठी दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी अर्ज केले. परंतु जागा ४० ते ६० असतात. पुणे विद्यापीठाने विद्या परिषदेत निवृत्तीनंतरही प्राध्यापकांना विद्यार्थी घेता येणार, असा निर्णय घेतला. आपल्या येथे पेट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत गाईड कमी आहेत. परंतु विद्यार्थ्यांना संशोधन करता आले पाहिजे. त्यामुळे आपल्याकडेही वयाची अट वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यास कुलगुरूंनी संमती दर्शविली. आगामी कालावधीत निर्णय घेऊन यूजीसीकडे हा विषय पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.‘नॅक’वरून गोंधळबैठकीच्या सुरुवातीलाच नॅकच्या तयारीचा आढावा घेण्यात आला़ १३ ते १५ डिसेंबरदरम्यान नॅकच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या रंगीत तालमीत राज्याबाहेरील दहा तज्ज्ञांवर किती खर्च झाला, त्यांनी दिलेला अहवाल, उपाययोजना यासंदर्भात सदस्यांनी विचारणा केली़ या समितीने सादर केलेला अहवाल दडवून ठेवला़ तो जोपर्यंत सदस्यांना देत नाही, तोपर्यंत बैठक होणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. माहिती लपविल्याने आक्षेप घेत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले़आज विद्यापीठाचा अर्थसंकल्पडॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आगामी वर्षातील अर्थसंकल्प नेहमीप्रमाणे ५३ कोटी तुटीचा असणार आहे़ हा अर्थसंकल्प मंगळवारी होणाऱ्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे़ सूत्रांच्या माहितीनुसार ३१२ कोटींचा हा अर्थसंकल्प असणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठdroughtदुष्काळStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद