शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

टँकरचालक गल्लीबोळातही बेदरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:01 IST

पाणीटंचाई वाढल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कमी वेळेत जास्त फेऱ्या मारण्याच्या प्रयत्नात गल्लीबोळात बेदरकार वाहने पळविली जात आहेत. चालकावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. परिणामी, किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात सतत होत आहेत.

ठळक मुद्देधावता राक्षस : सातारा, मिसारवाडी, चिकलठाणा, गारखेडा, पडेगाव, हर्सूल, सिडको भागात सतत भीती

औरंगाबाद : पाणीटंचाई वाढल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कमी वेळेत जास्त फेऱ्या मारण्याच्या प्रयत्नात गल्लीबोळात बेदरकार वाहने पळविली जात आहेत. चालकावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. परिणामी, किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात सतत होत आहेत.सातारा, चिकलठाणा, गारखेडा, पडेगाव, सिडको, हर्सूल, नक्षत्रवाडीसह परिसरात टँकरच्या फेºया सतत सुरू आहेत. ५ हजार तसेच २ हजार लिटरच्या पाणी टँकरची मोठी मागणी आहे. वेळेच्या आत पाण्याच्या खेपा टाकण्याचा टँकरचालकाचा प्रयत्न असतो, टँकर रिकामे केल्यानंतर ते पुन्हा भरण्यासाठी घाई करावी लागते. या प्रयत्नात दररोज किरकोळ अपघाताचे प्रकारही वाढले आहेत. गल्लीबोळात मोठ्या क्षमतेचे टँकर फिरू शकत नसल्याने २ हजार लिटरचे टँकर वाढले आहेत. मनपाकडे पाणी भरण्यासाठी येणाºया टँकरची रजिस्टरवर नोंद आहे; परंतु खाजगी टँकरचे पिकअप पॉइंट विविध ठिकाणी असल्याने त्याचा आकडा कुठेही दिसत नाही. प्रामुख्याने कोणतेही वाहन घेतल्यास त्याची नोंद आरटीओ कार्यालयात करावीच लागते, त्या वाहनाचा उपयोग काय आणि ते कोणत्या कामासाठी वापरले जाणार आहे. त्यानुसार रीतसर पासिंग केली जाते; परंतु पाचशेपेक्षा अधिक छोटे-मोठे टँकर शहर व परिसरात फिरत असून, त्यांच्याकडे आरटीओ कार्यालयाचा वाहतूक परवानाच असल्याचे समजते; परंतु ते कमर्शियल पाणीपुरवठा करणार आहे, अशी नोंद केल्याचे तुरळक सापडतात.मनपाची नव्हे आरटीओची जबाबदारीमनपाकडे पाणी भरणाºया टँकरपैकी किती वाहनांना रीतसर टँकरचा परवाना आहे, याविषयी खात्रीलायक उत्तर मनपाच्या अधिकाºयाकडे देखील मिळत नाही. भाडेतत्त्वावर ते पाणी भरून नेतात त्याविषयी नोंद घेतल्याचे जाणवत नाही. ती जबाबदारी आरटीओ कार्यालयाची असल्याचे सूत्राकडून समजते. मनपाकडे १०६ टँकरपाणीपुरवठा करण्यासाठी मनपाकडे रीतसर १०६ टँकरचीच नोंद असून, ते अधिकृत आहेत. ते दिवसभरात सहाशेपेक्षा अधिक फेºया मारतात; परंतु खाजगी मालकीच्या टँकरची संख्या १,२५० च्या आसपास गणली जाते. त्यांची अधिकृत कुठेही नोंद नाही. विविध सेंटरवर पाणी भरण्यासाठी येणाºया टँकरवर ‘मनपाचा पाणीपुरवठा’, असे लिहिलेले असते, ते पाणी बिनधास्त विकताना दिसत आहेत. पाणीटंचाईमुळे कमाईचे साधन म्हणून पाणी विकण्याचा सोपा धंदा अनेकांनी सुरू केला आहे. टँकरसाठी आरटीओ कार्यालयाकडून लागणारे नियम त्यांनी धाब्यावर बसविलेले आहेत. टँकरची रीतसर तपासणी करण्याचे संकेतही आरटीओकडून मिळाले असून, मनपाचे अधिकारीदेखील टँकर लॉबीच्या दबावामुळे ‘ब्र’शब्द बोलू शकत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी