शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

टँकरचालक गल्लीबोळातही बेदरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:01 IST

पाणीटंचाई वाढल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कमी वेळेत जास्त फेऱ्या मारण्याच्या प्रयत्नात गल्लीबोळात बेदरकार वाहने पळविली जात आहेत. चालकावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. परिणामी, किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात सतत होत आहेत.

ठळक मुद्देधावता राक्षस : सातारा, मिसारवाडी, चिकलठाणा, गारखेडा, पडेगाव, हर्सूल, सिडको भागात सतत भीती

औरंगाबाद : पाणीटंचाई वाढल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कमी वेळेत जास्त फेऱ्या मारण्याच्या प्रयत्नात गल्लीबोळात बेदरकार वाहने पळविली जात आहेत. चालकावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. परिणामी, किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात सतत होत आहेत.सातारा, चिकलठाणा, गारखेडा, पडेगाव, सिडको, हर्सूल, नक्षत्रवाडीसह परिसरात टँकरच्या फेºया सतत सुरू आहेत. ५ हजार तसेच २ हजार लिटरच्या पाणी टँकरची मोठी मागणी आहे. वेळेच्या आत पाण्याच्या खेपा टाकण्याचा टँकरचालकाचा प्रयत्न असतो, टँकर रिकामे केल्यानंतर ते पुन्हा भरण्यासाठी घाई करावी लागते. या प्रयत्नात दररोज किरकोळ अपघाताचे प्रकारही वाढले आहेत. गल्लीबोळात मोठ्या क्षमतेचे टँकर फिरू शकत नसल्याने २ हजार लिटरचे टँकर वाढले आहेत. मनपाकडे पाणी भरण्यासाठी येणाºया टँकरची रजिस्टरवर नोंद आहे; परंतु खाजगी टँकरचे पिकअप पॉइंट विविध ठिकाणी असल्याने त्याचा आकडा कुठेही दिसत नाही. प्रामुख्याने कोणतेही वाहन घेतल्यास त्याची नोंद आरटीओ कार्यालयात करावीच लागते, त्या वाहनाचा उपयोग काय आणि ते कोणत्या कामासाठी वापरले जाणार आहे. त्यानुसार रीतसर पासिंग केली जाते; परंतु पाचशेपेक्षा अधिक छोटे-मोठे टँकर शहर व परिसरात फिरत असून, त्यांच्याकडे आरटीओ कार्यालयाचा वाहतूक परवानाच असल्याचे समजते; परंतु ते कमर्शियल पाणीपुरवठा करणार आहे, अशी नोंद केल्याचे तुरळक सापडतात.मनपाची नव्हे आरटीओची जबाबदारीमनपाकडे पाणी भरणाºया टँकरपैकी किती वाहनांना रीतसर टँकरचा परवाना आहे, याविषयी खात्रीलायक उत्तर मनपाच्या अधिकाºयाकडे देखील मिळत नाही. भाडेतत्त्वावर ते पाणी भरून नेतात त्याविषयी नोंद घेतल्याचे जाणवत नाही. ती जबाबदारी आरटीओ कार्यालयाची असल्याचे सूत्राकडून समजते. मनपाकडे १०६ टँकरपाणीपुरवठा करण्यासाठी मनपाकडे रीतसर १०६ टँकरचीच नोंद असून, ते अधिकृत आहेत. ते दिवसभरात सहाशेपेक्षा अधिक फेºया मारतात; परंतु खाजगी मालकीच्या टँकरची संख्या १,२५० च्या आसपास गणली जाते. त्यांची अधिकृत कुठेही नोंद नाही. विविध सेंटरवर पाणी भरण्यासाठी येणाºया टँकरवर ‘मनपाचा पाणीपुरवठा’, असे लिहिलेले असते, ते पाणी बिनधास्त विकताना दिसत आहेत. पाणीटंचाईमुळे कमाईचे साधन म्हणून पाणी विकण्याचा सोपा धंदा अनेकांनी सुरू केला आहे. टँकरसाठी आरटीओ कार्यालयाकडून लागणारे नियम त्यांनी धाब्यावर बसविलेले आहेत. टँकरची रीतसर तपासणी करण्याचे संकेतही आरटीओकडून मिळाले असून, मनपाचे अधिकारीदेखील टँकर लॉबीच्या दबावामुळे ‘ब्र’शब्द बोलू शकत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी