शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

टँकरचालक गल्लीबोळातही बेदरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:01 IST

पाणीटंचाई वाढल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कमी वेळेत जास्त फेऱ्या मारण्याच्या प्रयत्नात गल्लीबोळात बेदरकार वाहने पळविली जात आहेत. चालकावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. परिणामी, किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात सतत होत आहेत.

ठळक मुद्देधावता राक्षस : सातारा, मिसारवाडी, चिकलठाणा, गारखेडा, पडेगाव, हर्सूल, सिडको भागात सतत भीती

औरंगाबाद : पाणीटंचाई वाढल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कमी वेळेत जास्त फेऱ्या मारण्याच्या प्रयत्नात गल्लीबोळात बेदरकार वाहने पळविली जात आहेत. चालकावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. परिणामी, किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात सतत होत आहेत.सातारा, चिकलठाणा, गारखेडा, पडेगाव, सिडको, हर्सूल, नक्षत्रवाडीसह परिसरात टँकरच्या फेºया सतत सुरू आहेत. ५ हजार तसेच २ हजार लिटरच्या पाणी टँकरची मोठी मागणी आहे. वेळेच्या आत पाण्याच्या खेपा टाकण्याचा टँकरचालकाचा प्रयत्न असतो, टँकर रिकामे केल्यानंतर ते पुन्हा भरण्यासाठी घाई करावी लागते. या प्रयत्नात दररोज किरकोळ अपघाताचे प्रकारही वाढले आहेत. गल्लीबोळात मोठ्या क्षमतेचे टँकर फिरू शकत नसल्याने २ हजार लिटरचे टँकर वाढले आहेत. मनपाकडे पाणी भरण्यासाठी येणाºया टँकरची रजिस्टरवर नोंद आहे; परंतु खाजगी टँकरचे पिकअप पॉइंट विविध ठिकाणी असल्याने त्याचा आकडा कुठेही दिसत नाही. प्रामुख्याने कोणतेही वाहन घेतल्यास त्याची नोंद आरटीओ कार्यालयात करावीच लागते, त्या वाहनाचा उपयोग काय आणि ते कोणत्या कामासाठी वापरले जाणार आहे. त्यानुसार रीतसर पासिंग केली जाते; परंतु पाचशेपेक्षा अधिक छोटे-मोठे टँकर शहर व परिसरात फिरत असून, त्यांच्याकडे आरटीओ कार्यालयाचा वाहतूक परवानाच असल्याचे समजते; परंतु ते कमर्शियल पाणीपुरवठा करणार आहे, अशी नोंद केल्याचे तुरळक सापडतात.मनपाची नव्हे आरटीओची जबाबदारीमनपाकडे पाणी भरणाºया टँकरपैकी किती वाहनांना रीतसर टँकरचा परवाना आहे, याविषयी खात्रीलायक उत्तर मनपाच्या अधिकाºयाकडे देखील मिळत नाही. भाडेतत्त्वावर ते पाणी भरून नेतात त्याविषयी नोंद घेतल्याचे जाणवत नाही. ती जबाबदारी आरटीओ कार्यालयाची असल्याचे सूत्राकडून समजते. मनपाकडे १०६ टँकरपाणीपुरवठा करण्यासाठी मनपाकडे रीतसर १०६ टँकरचीच नोंद असून, ते अधिकृत आहेत. ते दिवसभरात सहाशेपेक्षा अधिक फेºया मारतात; परंतु खाजगी मालकीच्या टँकरची संख्या १,२५० च्या आसपास गणली जाते. त्यांची अधिकृत कुठेही नोंद नाही. विविध सेंटरवर पाणी भरण्यासाठी येणाºया टँकरवर ‘मनपाचा पाणीपुरवठा’, असे लिहिलेले असते, ते पाणी बिनधास्त विकताना दिसत आहेत. पाणीटंचाईमुळे कमाईचे साधन म्हणून पाणी विकण्याचा सोपा धंदा अनेकांनी सुरू केला आहे. टँकरसाठी आरटीओ कार्यालयाकडून लागणारे नियम त्यांनी धाब्यावर बसविलेले आहेत. टँकरची रीतसर तपासणी करण्याचे संकेतही आरटीओकडून मिळाले असून, मनपाचे अधिकारीदेखील टँकर लॉबीच्या दबावामुळे ‘ब्र’शब्द बोलू शकत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी