शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
3
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
4
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
5
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
6
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
8
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
9
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
10
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
11
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
12
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
13
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
14
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
15
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
16
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
17
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
18
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
19
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
20
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई करा, अन्यथा न्यायालयात दाद मागू

By admin | Updated: May 29, 2014 00:30 IST

उस्मानाबाद : पोलिस अधीक्षक सचिन पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्या उपस्थितीत रिंगण करून ग्रामस्थांवर अत्याचार करण्यात आले.

उस्मानाबाद : पोलिस अधीक्षक सचिन पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्या उपस्थितीत रिंगण करून ग्रामस्थांवर अत्याचार करण्यात आले. हा प्रकार संतापजनक..तितकाच निंदनीय आहे. या वरिष्ठ अधिकार्‍यांसह दोषी कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करावी. केवळ बदली, बडतर्फी करून चालणार नाही तर या अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आपण न्यायालयात दाद मागू असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी दिला. पोलिस महासंचालकांनी केलेली चौकशी आम्हाला मान्य नाही. पोलिस अधीक्षक सचिन पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप आहेत. त्यांना सोबत घेऊन महासंचालक कशी काय चौकशी करू शकतात. हा प्रकार धूळफेक असल्याचे सांगत, दारूबंदीची मागणी करणार्‍या महिला ग्रामस्थांना एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे पोलिसांनी कोंबीग आॅपरेशन करून मारहाण केली आहे. यावेळी डीवायएसपी कडूकर यांनी शिवीगाळही केल्याचे सांगत, हा प्रकार अधिकार्‍यांना शोभणारा नसल्याचे ते म्हणाले. संपूर्ण राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आज गंभीर बनला आहे. महिला, दलित असुरक्षित आहेत. आता ग्रामस्थांची सुरक्षाही धोक्यात आल्याचे कनगरा प्रकरणावरून दिसून येते, अशा वेळी गृहमंत्री आर. आर. पाटील गप्प का? असा सवाल करीत शासनाने या प्रकरणी ग्रामस्थांची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही तावडे यांनी केली. प्रकरणाची न्यायालयीन चौकशीच झाली पाहिजे, असा आमचा आग्रह असून, यासाठी येणार्‍या अधिवेशनात सभागृहाच्या दोन्ही सदनाचे काम आम्ही बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहु महाराजांच्या महाराष्टÑाला काळीमा फासणारी ही घटना असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पत्रकार परिषदेला आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अ‍ॅड. मिलींद पाटील, जि. प. सदस्य कैलास शिंदे, दत्ता कुलकर्णी, संजय निंबाळकर, सुधीर पाटील, धनंजय शिंगाडे यांच्यासह आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. (प्रतिनिधी) ....या आहेत मागण्या कनगरा एकटे नाही, उभा महाराष्टÑ या ग्रामस्थांच्या पाठीशी असल्याचे सांगत, सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, जखमीवर शासकीय खर्चाने उपचार करावेत, ज्यांना गंभीर व कायमस्वरुपी इजा पोहोचली आहे, अशा ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाची सोय करावी. पोलिसी अत्याचारात घराचे तसेच संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई द्यावी, आणि दोषी अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, आदी मागण्या तावडे यांनी यावेळी केल्या. अटकेतील तिघांची होणार सुटका तीन ग्रामस्थ अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहेत. या तिघांचीही तातडीने सुटका करावी, अशी मागणी आपण गृहविभागाकडे केली असून, याबाबत लवकरच कार्यवाही करण्याची ग्वाही देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकार्‍यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवावा, अशी सूचना केली असून, तसा अहवाल तातडीने देणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितल्याची माहितीही तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासनाने योग्य कारवाई न केल्यास पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा शब्दही तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.