शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

...असा हा आदर्श विवाह; हर्सूलकरांच्या साक्षीने अनाथ गौरी अडकली रेशमी बंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 16:22 IST

औताडे परिवाराने दत्तक घेतलेल्या १७ अनाथ कन्यांमधील पहिले शुभमंगल

ठळक मुद्देवऱ्हाडींच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू 

औरंगाबाद : वार बुधवार... वेळ रात्री १०.३० ची... हर्सूलच्या भगतसिंगनगरलगतच्या मैदानावर हजारो हर्सूलकर एकत्रित आलेले. ‘शुभमंगल सावधान’ असे मंगलाष्टक झाले... टाळ्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी झाली आणि अनाथ गौरीचे लग्न थाटामाटात लागले. गौरीचे भाग्य उजळले, असे म्हणत उपस्थित शेकडो महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. 

हरसिद्धी माता यात्रोत्सव व अनिता औताडे यांच्या स्मरणार्थ उपमहापौर विजय औताडे यांनी गौरीचे कन्यादान केले. औताडे यांच्या १७ अनाथ दत्तक कन्यांमधील भगवान बाबा बालिका आश्रमामधील गौरी ही एक. तिचा विवाह बुधवारी अमित सोनवणे या युवकाशी लावण्यात आला. तिच्या या लग्नाचे साक्षीदार ठरले ते महापौर नंदकुमार घोडले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे. या समारंभाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे वºहाडी म्हणून उपस्थित होते. भव्य मैदान वºहाडींनी भरून गेले होते. 

आजूबाजूच्या अपार्टमेंटवरही अनेक वºहाडी उभे होते. ‘वाजती चौघडा... टाका अक्षता प्रेमाने... शुभ मंगल सावधान...’ असे मंगलाष्टक संपताच हजारो वºहाडींनी अक्षतारूपी आशीर्वाद देत टाळ्यांचा कडकडाट केला अन् अर्पाटमेंटवरून फटाक्यांची आतषबाजी झाली. ‘आता गौरी अनाथ राहिली नाही, अमितच्या रूपाने नाथ मिळाला, पोरीचे भाग्य उजळले,’ असे अनेक महिला पुटपुटत होत्या. आपल्याच पोटच्या मुलीचे लग्न लागले, अशीच भावना त्यांची होती. ‘अनाथ मुलींना दत्तक घेऊन त्यांचे लग्न लावून देऊन विजय औताडे यांनी समाजासमोरच नव्हे, तर राजकारण्यांसमोर एक आदर्श निर्माण केल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. या भव्य सोहळ्याचे कौतुक हरिभाऊ बागडे यांनी केले.

समाजाचे देणे लागतो या भावनेतून मी १७ अनाथ मुलींना दत्तक घेतले व त्यातील पहिल्या मुलीचे लग्न लावले. ही प्रेरणा माझी आई व वडिलांकडून मिळाली, अशा शब्दांत विजय औताडे यांनी आपली भावना व्यक्त केली. तत्पूर्वी, भरत गणेशपुरे यांनी विनोदी स्कीट सादर करून सर्वांना हसविले व सोनाली कुलकर्णीने ‘आई’ या गीतावर नृत्य करून सर्वांची मने जिंकली. गायक राजेश सरकटे यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे खड्या आवाजातील गीत सादर करून देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. सूत्रसंचालक समाधन इंगळे यांनी विविध किस्से सांगून रंगत आणली.

हे सर्व  स्वप्नवतच -गौरी लग्न लागल्यानंतर गौरी म्हणाली की, हे सर्व स्वप्नवतच. मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की, माझे लग्न एवढ्या मोठ्या मंडपात होईल. एवढे मान्यवर व हजारो वºहाडी माझ्या लग्नाला येतील. आता मी अनाथ नाही. मलाही हक्काचे कुटुंब मिळाले आहे, असे सांगताना तिने आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादFamilyपरिवारSocialसामाजिक