शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

...असा हा आदर्श विवाह; हर्सूलकरांच्या साक्षीने अनाथ गौरी अडकली रेशमी बंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 16:22 IST

औताडे परिवाराने दत्तक घेतलेल्या १७ अनाथ कन्यांमधील पहिले शुभमंगल

ठळक मुद्देवऱ्हाडींच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू 

औरंगाबाद : वार बुधवार... वेळ रात्री १०.३० ची... हर्सूलच्या भगतसिंगनगरलगतच्या मैदानावर हजारो हर्सूलकर एकत्रित आलेले. ‘शुभमंगल सावधान’ असे मंगलाष्टक झाले... टाळ्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी झाली आणि अनाथ गौरीचे लग्न थाटामाटात लागले. गौरीचे भाग्य उजळले, असे म्हणत उपस्थित शेकडो महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. 

हरसिद्धी माता यात्रोत्सव व अनिता औताडे यांच्या स्मरणार्थ उपमहापौर विजय औताडे यांनी गौरीचे कन्यादान केले. औताडे यांच्या १७ अनाथ दत्तक कन्यांमधील भगवान बाबा बालिका आश्रमामधील गौरी ही एक. तिचा विवाह बुधवारी अमित सोनवणे या युवकाशी लावण्यात आला. तिच्या या लग्नाचे साक्षीदार ठरले ते महापौर नंदकुमार घोडले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे. या समारंभाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे वºहाडी म्हणून उपस्थित होते. भव्य मैदान वºहाडींनी भरून गेले होते. 

आजूबाजूच्या अपार्टमेंटवरही अनेक वºहाडी उभे होते. ‘वाजती चौघडा... टाका अक्षता प्रेमाने... शुभ मंगल सावधान...’ असे मंगलाष्टक संपताच हजारो वºहाडींनी अक्षतारूपी आशीर्वाद देत टाळ्यांचा कडकडाट केला अन् अर्पाटमेंटवरून फटाक्यांची आतषबाजी झाली. ‘आता गौरी अनाथ राहिली नाही, अमितच्या रूपाने नाथ मिळाला, पोरीचे भाग्य उजळले,’ असे अनेक महिला पुटपुटत होत्या. आपल्याच पोटच्या मुलीचे लग्न लागले, अशीच भावना त्यांची होती. ‘अनाथ मुलींना दत्तक घेऊन त्यांचे लग्न लावून देऊन विजय औताडे यांनी समाजासमोरच नव्हे, तर राजकारण्यांसमोर एक आदर्श निर्माण केल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. या भव्य सोहळ्याचे कौतुक हरिभाऊ बागडे यांनी केले.

समाजाचे देणे लागतो या भावनेतून मी १७ अनाथ मुलींना दत्तक घेतले व त्यातील पहिल्या मुलीचे लग्न लावले. ही प्रेरणा माझी आई व वडिलांकडून मिळाली, अशा शब्दांत विजय औताडे यांनी आपली भावना व्यक्त केली. तत्पूर्वी, भरत गणेशपुरे यांनी विनोदी स्कीट सादर करून सर्वांना हसविले व सोनाली कुलकर्णीने ‘आई’ या गीतावर नृत्य करून सर्वांची मने जिंकली. गायक राजेश सरकटे यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे खड्या आवाजातील गीत सादर करून देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. सूत्रसंचालक समाधन इंगळे यांनी विविध किस्से सांगून रंगत आणली.

हे सर्व  स्वप्नवतच -गौरी लग्न लागल्यानंतर गौरी म्हणाली की, हे सर्व स्वप्नवतच. मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की, माझे लग्न एवढ्या मोठ्या मंडपात होईल. एवढे मान्यवर व हजारो वºहाडी माझ्या लग्नाला येतील. आता मी अनाथ नाही. मलाही हक्काचे कुटुंब मिळाले आहे, असे सांगताना तिने आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादFamilyपरिवारSocialसामाजिक