शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी संघर्ष !

By admin | Updated: April 16, 2016 23:26 IST

नितीन कांबळे ल्ल कडा मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करीत आलेल्या आष्टी तालुक्यातील खिळद ग्रामस्थांची आजही हंडाभर पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

खिळद गावची परिस्थिती : दोन टँकरवर तीन हजार नागरिकांची भागतेय तहाननितीन कांबळे ल्ल कडामागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करीत आलेल्या आष्टी तालुक्यातील खिळद ग्रामस्थांची आजही हंडाभर पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात केवळ दोनच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.खिळद गावची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात आहे. परंतु परिसरातील जलस्त्रोत आटल्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. भटकंती करूनही पाणी मिळत नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. प्रशासनाकडे हात पसरल्यानंतर केवळ दोन टँकर देऊन बोळवण करण्यात आली. परंतु गावची लोकसंख्या पाहता टँकरची संख्या खूपच अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.अनेक वेळा वेळेवर टँकर येत नसल्याने लहान मुलांना सोबत घेऊन महिला उजाडल्यापासूनच घराबाहेर पडत आहेत. ही परिस्थिती केवळ खिळद ग्रामस्थांची नसून, परिसरातील १० ते १५ खेड्यांमधील चित्र यापेक्षा वेगळे नाही.एप्रिल महिन्यातच खिळद गावात भीषण पाणीटंचाई जाणवू लागल्याने येणारे दोन महिने काढायचे कसे असा प्रश्न आता ग्रामस्थांसमोर उभा आहे. पाणी उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी स्थलांतरही केले आहे. काहीजण शेतात राहण्यासाठी गेले आहेत. जनावरांचेही पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असल्याने शेतकऱ्यांनी जनावरे विकून टाकली आहेत.टँकरची संख्या वाढवासध्या सुरू असलेली टँकरची संख्या खूपच अपुरी आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. टँकरची संख्या वाढवून ग्रामस्थांचे हाल कमी करावेत, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.लहान मुलांच्याही डोक्यावर दिसतो पाण्याचा हंडाआष्टी तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांची वणवण भटकंती सुरू आहे. सकाळी उजाडतच लहान मुलांपासून ते महिला, पुरूषांच्या डोक्यावर पाण्याचा हंडा पाहवयास मिळतो. ही परिस्थिती संपूर्ण तालुक्यात दिसून येते.जनावरांचेही पिण्याच्या पाण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे बाजारात विक्रीसाठी दाखल केली आहेत. तसेच परिसरातील जलस्त्रोतही आटल्यामुळे पाणी आणायचे कोठून ? असा प्रश्न खिळद ग्रामस्थांसमोर उपस्थित राहिला आहे.