शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त विद्यार्थ्यांचे विद्यापीठात ठिय्या आंदोलन

By admin | Updated: April 7, 2015 01:26 IST

औरंगाबाद : ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरप्रेन्युअरशिप व्होकेशनल गाईडन्स अँड करिअर कौन्सिलिंग’चे शिक्षण घेणाऱ्या ४० विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा न घेताच

औरंगाबाद : ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरप्रेन्युअरशिप व्होकेशनल गाईडन्स अँड करिअर कौन्सिलिंग’चे शिक्षण घेणाऱ्या ४० विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा न घेताच सर्वांना नापास केल्याचा प्रताप समोर आला आहे. यासंदर्भात शनिवारी संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले. जनशिक्षण संस्थान संचलित ‘व्होकेशनल गाईडन्स अँड करिअर कौन्सिलिंग महाविद्यालयाचे’ प्राचार्य डॉ. सतीश सुराणा व विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. चोपडे यांची भेट घेऊन या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्य तथा अधिष्ठाता डॉ. गणेश शेटकर यांनी केलेल्या कारनाम्यांचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, एकतर आमचा हा अभ्यासक्रम सामाजिकशास्त्रे विभागाशी संलग्नित आहे. असे असताना या अभ्यासक्रमाची परीक्षा ही शिक्षणशास्त्र विभागामार्फत कशी घेतली जाते. डॉ. शेटकर यांनी या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा न घेताच निकाल जाहीर कसा केला, या प्रकरणाची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करावी व दोषी शेटकर यांच्याविरुद्ध कारवाई करावी. तेव्हा कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचा हा प्रश्न परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा करून सोडविला जाईल, असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात वार्षिक लेखी परीक्षा दिली. सर्व विद्यार्थी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले; मात्र प्रात्यक्षिक परीक्षा न घेताच निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सर्व विद्यार्थी लेखी परीक्षेत पास, तर प्रात्यक्षिकामध्ये नापास करण्यात आले. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे वारंवार निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर कंटाळून विद्यार्थ्यांनी विद्यापीठात ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्यानंतर अभ्यास मंडळ (बीओई) बैठकीमध्ये चर्चा करून यासंबंधी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी गीता अंभोरे, महादेव डोंगरे, सोमनाथ टोपे, शीतल तुसामकर, गजानन वैद्य, संतोष माळी, धम्मरत्न मेश्राम, गणेश कमोद, दादासाहेब खेलवाने, प्रणाली जगजीवन, भगवान बावस्कर, सुनील चव्हाण आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.