शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभर आगार, बसस्थानके होणार चकाचक

By admin | Updated: April 26, 2016 23:44 IST

गोविंद मुदखेडकर, हिंगोली राज्यातील एस. टी. महामंडाळाचे सर्व आगार व बसस्थाकांमध्ये स्वच्छता अभियान राबवून १ मेपर्यंत कालबद्ध पद्धतीने स्वच्छ करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालकांनी दिल्या

गोविंद मुदखेडकर, हिंगोलीराज्यातील एस. टी. महामंडाळाचे सर्व आगार व बसस्थाकांमध्ये स्वच्छता अभियान राबवून १ मेपर्यंत कालबद्ध पद्धतीने स्वच्छ करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच राज्यातील सर्व आगार व बसस्थानके आता आपल्याला स्वच्छ झालेली दिसणार आहेत.राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत प्रादेशिक व्यवस्थापक, विभाग नियंत्रक व विभागीय अभियंता तसेच सर्व खातेप्रमुखांची नुकतीच बैठक झाली. त्यात हे आदेश दिले. शिवाय मोहीम सुरू होण्यापूर्वीचे व स्वच्छता झाल्यानंतरचे छायाचित्रीकरण संबंधित आगाराने मध्यवर्ती कार्यालयास पाठविण्यासंबंधी सूचित केले आहे. स्वच्छता अभियानांतर्गत बसस्थानके, आगार, प्रसाधनगृहे, वाहनतळ, चालक, वाहकांचे विश्रांतीगृह या आस्थापना संपूर्ण स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मोहिमेदरम्यान बसस्थानकावर प्रत्येक फलाटावर किमान एक व बसस्थानक परिसरात तसेच विशेषत: महिला प्रसाधनगृहामध्ये कचरापेटी ठेवणे, आगार व कार्यशाळा परिसर स्वच्छ करताना सर्व मेंटनन्स रॅम्प, स्टोअर रूम, इंधन रूम, कार्यालयीन कक्ष, यांत्रिकी विश्रामगृह, आगार कर्मचाऱ्यांची स्वच्छतागृहे, विश्रांतीगृह, महिला विश्रामगृह आदी परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच आगार व्यवस्थापक, बसस्थानक प्रमुख, कार्यशाळा अधीक्षक यांना आगार, बसस्थानक, फलाट, परिसर, स्वच्छतागृह व चालकवाहक विश्रांतीगृह यांची स्वच्छता दिवसभरातून दर दोन तासांनी करून घेण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी स्वच्छता पाहणी केल्यानंतर स्वच्छतेबाबत ठेवलेल्या नोंदवहीमध्ये दिनांक व वेळेसहीत स्वाक्षरी करण्याच्या सूचना परिपत्रकात केल्या आहेत.१ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन असून ही मोहीम त्या दिवसापासून राबविण्यात येत आहे. यात बसस्थानकावर रांगोळ्या काढाव्यात, शोभेच्या फूलझाडांच्या कुंड्या ठेवून स्थानकाचे सुशोभिकरण करण्यासही सांगितले आहे. स्वच्छता पूर्ण झाल्याचा अहवाल ३० एप्रिल रोजी सर्व विभागांनी वाहतूक खाते मध्यवर्ती कार्यालयास विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय अभियंता व विभाग नियंत्रक यांच्या स्वाक्षरीने ई-मेलद्वारे दाखल करावयाचा आहे.यापुढे अस्वच्छता आढळल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुख यांना जवाबदार धरून त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. मोहिमेबाबत विभागीय वाहतूक अधिकारी (सामान्य) यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून सर्व प्रदेश, विभाग व प्रवाशांकडून येणारे ई-मेल तपासून त्यांना कारवाईचे अधिकार दिले आहेत.