शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या बियाणाची शेतकऱ्यांकडून चाचणी

By admin | Updated: July 7, 2014 00:19 IST

पालम : मृग नक्षत्र संपले तरी पावसाची सुरुवात झालेली नाही़ आज ना उद्या पाऊस पडेल या आशेने शेतकरी वर्ग बियाणे खरेदी करीत आहे़ यावर्षी प्रथमच सोयाबीनच्या बियाणाची टंचाई निर्माण झाली आहे़

पालम : मृग नक्षत्र संपले तरी पावसाची सुरुवात झालेली नाही़ आज ना उद्या पाऊस पडेल या आशेने शेतकरी वर्ग बियाणे खरेदी करीत आहे़ यावर्षी प्रथमच सोयाबीनच्या बियाणाची टंचाई निर्माण झाली आहे़ बियाणे खरेदी करताना शेतकरी दुकानावरच चाचणी करून खरेदी करीत आहेत़
पालम तालुक्यात मागील वर्षी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला होता़ परंतु, सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीनच्या उताऱ्यात निम्म्याने घट झाली होती़ यावर्षीही सोयाबीनच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे आहेत़ सोयाबीनचा भाव चार हजाराच्या पुढे गेला होता़ शेतकरी वर्ग सोयाबीन पिकाकडे नगदी पीक म्हणून बघत असतात़ या पिकाला रासायनिक खते व औषधांचा खर्चही कमी येतो़ यावर्षी बाजारपेठेत विविध कंपन्यांची बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ सोयाबीन बियाणाची टंचाई झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे़ पेरणीच्या तोंडावर बियाणांची खरेदी करण्यासाठी गर्दी वाढल्याने भावात वाढ झाली आहे़ दुकानावर सोयाबीनच्या बॅगमधील दाणे काढून शेतकरी उगवण क्षमतेची तपासणी करीत आहेत़ ८० टक्के चाचणीत बियाणे यशस्वी झाले तरच खरेदी केली जात आहे़ पाण्याच्या ग्लासमध्ये बियाणे टाकून थोडावेळ ठेवले जात आहे़ ज्या बियाणावर सुरकुत्या पडतील त्या बियाणाची मोजणी करून उगवण क्षमता ठरविली जात आहे़ ही पद्धत शास्त्रीय असो की नसो शेतकरी मात्र याच चाचणीवरच समाधानी राहत आहेत़ (प्रतिनिधी)
घरच्या बियणाचा वापरास धोका
बाजारपेठेत यावर्षी बियाणांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे़ शेतकऱ्यांनी यावर्षी पेरणीसाठी घरचे बियाणे वापरण्यावर भर दिला आहे़ ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या दर्जाचे बियाणे आहे ते शेतकरी पेरणीसाठी विक्री करीत आहेत़ यावर्षी सोयाबीन बियाणाच्या उगवण क्षमतेची कोणीच शाश्वती देत नाही़ यामुळे प्रक्रिया न करताच बियाणे पेरल्यास भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो़
पावसाची प्रतीक्षा
जून महिना पूर्णत: कोरडा गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ मागील वर्षी सध्याच्या कालावधीच्या काळात पेरणी झालेली होती़ यावर्षी पेरणी अजून किती लांबेल हे सांगणे कठीण आहे़ दररोज आलेला दिवस कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढत आहे़ पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून आहे़