शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाला अडीच हजार झाडांची तस्करी

By admin | Updated: April 16, 2016 23:27 IST

बीड जिल्ह्यात ४६ हजार ८०० हेक्टरावर गायरान क्षेत्र आहे. दहा वर्षांपूर्वी मोठ्या झाडांची संख्या भरपूर होती. आता मात्र, गायरान जमीन उजाड झाल्या आहेत.

व्यंकटेश वैष्णव / राजेश खराडेल्ल बीडबीड जिल्ह्यात ४६ हजार ८०० हेक्टरावर गायरान क्षेत्र आहे. दहा वर्षांपूर्वी मोठ्या झाडांची संख्या भरपूर होती. आता मात्र, गायरान जमीन उजाड झाल्या आहेत. दहा वर्षात येथील वृक्षांचे काय झाले ? हे दस्तुरखुद्द वनविभाग देखील सांगू शकत नाही, हे वास्तव आहे.दिवसाला अडीच हजार वृक्षांची तस्करी केली जात आहे. हा प्रकार जिल्हा प्रशासन उघड्या डोळ्याने पाहत आहे. सिंचन, पाणी या विषयावर मोठी चर्चा होते. मात्र, वृक्ष लागवड, संगोपनावर कोणीच पुढे येत नाही. जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील वृक्षमित्र सुधाकर देशमुख हे मागील २७ वर्षांपासून वृक्ष वाचविण्यासाठी एकाकी झुंज देत आहेत. आता शेतकऱ्यांना वृक्ष संगोपनासाठी शासनाने अनुदान देण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन लोढा यांनी केली.वर्षभरात केवळ ६८ कारवायाअवैध वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या ६८ जणांवर वनविभागीय कार्याकडून कारवाया झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर अथपूर्ण हेतूमुळे वनरक्षक, वनमजूर यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. वनरक्षक, मोबाईल स्कॉड तसेच पोलीस प्रशासनाचे व वनविभागाचे खबरे असूनही केवळ ६८ कारवाया झाल्या आहेत.लागवड करूनही मिळेना उभारी२०१३ ते २०१८ या कालावधीत शतकोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. सुरवातीच्या दोन वर्षात २३ लाख वृक्षलागवड केली असल्याचा निर्वाळा वनविभागाने दिला आहे. लागवड झाली असली तरी त्याची जोपासना होत नसल्याने योजनेला उभारी मिळेना झाली आहे. चालू वर्षात १४६४ हेक्टरावर १६ लाख २५ हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार कामे सुरू असल्याचे वन विभागीय अधिकारी आर.आर.काळे यांनी सांगितले. वनक्षेत्रालगतच्या गावांकडून धोकाअवैध वृक्षतोडीचा धोका अधिकतर वनक्षेत्रालगतच्या गावकऱ्यांकडून होत आहे. वनक्षेत्रालगत जिल्ह्यात १२० गावांचा समावेश आहे. जनजागृतीसाठी समितीही नेमण्यात आली आहे. मात्र, अधिकाऱ्यांची उदासिनता व ग्रामस्थांची मानसिकता बदलत नसल्याने वृक्षतोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वृक्षतोडीवरील भार कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वनक्षेत्रालगतच्या ग्रामस्थांना एल.पी.जी. गॅसचे वाटप करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत ३७० जणांना याचे वाटप झाले आहे. गायरानावर अतिक्रमण जिल्ह्यात गायरानाचे क्षेत्र ६२ हजार हेक्टरावर होते. या प्रशासनाच्या जागेवर वृक्षलागवड करून वनक्षेत्रवाढीसाठी उपयोग होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून या गायरानावरही नागरिक अतिक्रमण करीत आहे. त्यामुळे हे क्षेत्र ४८ हजार हेक्टरावर आले आहे. महसून प्रशासनाचाही धाक राहिलेला नाही. वृक्षलागवडीचा दिखावावनविभागामार्फत वन क्षेत्र वाढविण्याकरिता वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मात्र वृक्षसंवर्धनाबाबत दुर्लक्ष होत असल्याने लागवडीचा खर्च दरवर्षी खेड्डे खोदण्यातच खर्ची होत आहे. केवळ दिखाऊपणा न करिता सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची जाण ठेऊन कामे होणे गरजेचे आहे.जिल्ह्यात अशा प्रकारे विना परवाना वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाते. ठिकठिकाणी झाडांचे ओंडके आढळून येत आहेत. परळी तालुक्यात ओल्या झाडांची साल कापून झाड वाळवले जाते. नंतर सरपणासाठी तोडले जाते.वर्षभराचे उपक्रम आणि जलयुक्त अभियनांतर्गत जलमृदा संधारणाची कामे झाली आहेत. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा मंत्र कृतीत उतरिवण्यासाठी वृक्षलागवडीचे पावसाळा हंगामापूर्वीचे नियोजन पूर्ण केले आहे. १ जुलै रोजी जिल्ह्यात विविध विभागांतर्गत ३ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. - आर.आर.काळे, उपविभागीय वनाधिकारी