शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! अकरावी उत्तीर्ण शेकडो विद्यार्थ्यांचे बारावीसाठी गावाकडे चला अभियान

By राम शिनगारे | Updated: June 25, 2024 20:01 IST

बारावी ग्रामीण भागात करण्याचा इरादा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची शिक्षण उपसंचालकांकडे धाव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये प्रवेश न घेताच टीसी काढण्यासाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागांमध्ये बारावीसाठी प्रवेश घ्यायचा असल्यामुळे अर्ज केल्याचा दावा कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासकांनी केला आहे.

अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी शहरातील विद्यार्थ्यांची ग्रामीण भागांमध्ये झुंबड उडाली आहे. या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात प्रवेश घेतल्यानंतर एकदाही वर्गात जाण्याची गरज नसते. त्याशिवाय पैकीच्या पैकी घरबसल्या प्रात्याक्षिकांचे मार्क मिळतात. परीक्षेच्या काळात मुक्त हस्ते कॉपी करण्यास मिळते. त्याउलट परिस्थिती शहरातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असते. विद्यार्थ्यांना वर्गात यावे लागते. प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागते. त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळत नाहीत. शहरातील परीक्षा केंद्रांवर कॉपी करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवेशासाठी विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. त्याठिकाणी प्रवेश घेऊन शहरांमध्ये विविध क्लासेसला अभ्यास करतात. मात्र, त्याचा परिणाम शहरातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये होत आहे. त्यामुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील, सचिव प्रा. गणेश शिंदे, देवगिरीचे उपप्राचार्य प्रा. सुरेश लिपाने, प्रा. नंदकिशोर गायकवाड, स.भु. विज्ञानचे प्रा. संजय गायकवाड, विवेकानंदचे प्रा. प्रदीप पाटील, मौलाना आझादचे प्रा. रशीद खान, छत्रपती महाविद्यालयाचे प्रा. भरत वहाटुळे, वसंतराव नाईकचे प्रा. एस.बी चव्हाण, डॉ. भारत खैरनार आणि भारत साेनवणे यांनी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांची भेट घेऊन ११ वी उत्तीर्णतेचे टीसी मागणाऱ्या विद्यार्थ्यांना पायबंद घालण्याची मागणी केली आहे.

७० शिक्षक झाले अतिरिक्तजिल्ह्यात अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ९५ एवढी आहे. त्यातील ४० कनिष्ठ महाविद्यालये छत्रपती संभाजीनगर शहरात आहेत. या महाविद्यालयात ६५० शिक्षक कार्यरत होते. त्यापैकी मागील वर्षी विद्यार्थी संख्या घटल्यामुळे ७० शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यात एकट्या स. भू. कनिष्ठ महाविद्यालयातील २० शिक्षकांचा समावेश आहे.

२५० पेक्षा अधिक स्वयंअर्थसहाय्यीत कनिष्ठ महाविद्यालयेजिल्ह्यात २५० पेक्षा अधिक स्वयं अर्थसहाय्यीत उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यात १५० शहरांत आहेत. या महाविद्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. शिक्षकांच्या नेमणुका केलेल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांची प्रचंड तूट असल्याचे वारंवार समोर येत आहे.

अकरावी उत्तीर्णतेच्या टीसीसाठी विद्यार्थ्यांचे अर्जमहाविद्यालय..........................अर्जांची संख्यादेवगिरी.....................................५००विवेकानंद..................................२००स.भू.विज्ञान................................१००मौलाना आझाद...........................१५०मिलिंद विज्ञान...............................७०छत्रपती कॉलेज ........................................१५०वसंतराव नाईक............................ ८०डॉ.आंबेडकर वाणिज्य....................४०मिलिंद कला..................................७०

क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास कारवाईग्रामीण भागामध्ये असलेल्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय मंडळाच्या पातळीवर परीक्षेसाठी तालुका पातळीवरीलच केंद्र देण्याविषयी विचार सुरू आहे तसेच महाविद्यालयांनी विनाकारण अकरावीचा टीसी मागणाऱ्यांना टीसी देऊ नये.- अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय