शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

धक्कादायक ! अकरावी उत्तीर्ण शेकडो विद्यार्थ्यांचे बारावीसाठी गावाकडे चला अभियान

By राम शिनगारे | Updated: June 25, 2024 20:01 IST

बारावी ग्रामीण भागात करण्याचा इरादा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची शिक्षण उपसंचालकांकडे धाव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये प्रवेश न घेताच टीसी काढण्यासाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागांमध्ये बारावीसाठी प्रवेश घ्यायचा असल्यामुळे अर्ज केल्याचा दावा कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासकांनी केला आहे.

अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी शहरातील विद्यार्थ्यांची ग्रामीण भागांमध्ये झुंबड उडाली आहे. या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात प्रवेश घेतल्यानंतर एकदाही वर्गात जाण्याची गरज नसते. त्याशिवाय पैकीच्या पैकी घरबसल्या प्रात्याक्षिकांचे मार्क मिळतात. परीक्षेच्या काळात मुक्त हस्ते कॉपी करण्यास मिळते. त्याउलट परिस्थिती शहरातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असते. विद्यार्थ्यांना वर्गात यावे लागते. प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागते. त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळत नाहीत. शहरातील परीक्षा केंद्रांवर कॉपी करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवेशासाठी विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. त्याठिकाणी प्रवेश घेऊन शहरांमध्ये विविध क्लासेसला अभ्यास करतात. मात्र, त्याचा परिणाम शहरातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये होत आहे. त्यामुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील, सचिव प्रा. गणेश शिंदे, देवगिरीचे उपप्राचार्य प्रा. सुरेश लिपाने, प्रा. नंदकिशोर गायकवाड, स.भु. विज्ञानचे प्रा. संजय गायकवाड, विवेकानंदचे प्रा. प्रदीप पाटील, मौलाना आझादचे प्रा. रशीद खान, छत्रपती महाविद्यालयाचे प्रा. भरत वहाटुळे, वसंतराव नाईकचे प्रा. एस.बी चव्हाण, डॉ. भारत खैरनार आणि भारत साेनवणे यांनी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांची भेट घेऊन ११ वी उत्तीर्णतेचे टीसी मागणाऱ्या विद्यार्थ्यांना पायबंद घालण्याची मागणी केली आहे.

७० शिक्षक झाले अतिरिक्तजिल्ह्यात अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ९५ एवढी आहे. त्यातील ४० कनिष्ठ महाविद्यालये छत्रपती संभाजीनगर शहरात आहेत. या महाविद्यालयात ६५० शिक्षक कार्यरत होते. त्यापैकी मागील वर्षी विद्यार्थी संख्या घटल्यामुळे ७० शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यात एकट्या स. भू. कनिष्ठ महाविद्यालयातील २० शिक्षकांचा समावेश आहे.

२५० पेक्षा अधिक स्वयंअर्थसहाय्यीत कनिष्ठ महाविद्यालयेजिल्ह्यात २५० पेक्षा अधिक स्वयं अर्थसहाय्यीत उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यात १५० शहरांत आहेत. या महाविद्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. शिक्षकांच्या नेमणुका केलेल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांची प्रचंड तूट असल्याचे वारंवार समोर येत आहे.

अकरावी उत्तीर्णतेच्या टीसीसाठी विद्यार्थ्यांचे अर्जमहाविद्यालय..........................अर्जांची संख्यादेवगिरी.....................................५००विवेकानंद..................................२००स.भू.विज्ञान................................१००मौलाना आझाद...........................१५०मिलिंद विज्ञान...............................७०छत्रपती कॉलेज ........................................१५०वसंतराव नाईक............................ ८०डॉ.आंबेडकर वाणिज्य....................४०मिलिंद कला..................................७०

क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास कारवाईग्रामीण भागामध्ये असलेल्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय मंडळाच्या पातळीवर परीक्षेसाठी तालुका पातळीवरीलच केंद्र देण्याविषयी विचार सुरू आहे तसेच महाविद्यालयांनी विनाकारण अकरावीचा टीसी मागणाऱ्यांना टीसी देऊ नये.- अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय