शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! अकरावी उत्तीर्ण शेकडो विद्यार्थ्यांचे बारावीसाठी गावाकडे चला अभियान

By राम शिनगारे | Updated: June 25, 2024 20:01 IST

बारावी ग्रामीण भागात करण्याचा इरादा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची शिक्षण उपसंचालकांकडे धाव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये प्रवेश न घेताच टीसी काढण्यासाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागांमध्ये बारावीसाठी प्रवेश घ्यायचा असल्यामुळे अर्ज केल्याचा दावा कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासकांनी केला आहे.

अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी शहरातील विद्यार्थ्यांची ग्रामीण भागांमध्ये झुंबड उडाली आहे. या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात प्रवेश घेतल्यानंतर एकदाही वर्गात जाण्याची गरज नसते. त्याशिवाय पैकीच्या पैकी घरबसल्या प्रात्याक्षिकांचे मार्क मिळतात. परीक्षेच्या काळात मुक्त हस्ते कॉपी करण्यास मिळते. त्याउलट परिस्थिती शहरातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असते. विद्यार्थ्यांना वर्गात यावे लागते. प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागते. त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळत नाहीत. शहरातील परीक्षा केंद्रांवर कॉपी करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवेशासाठी विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. त्याठिकाणी प्रवेश घेऊन शहरांमध्ये विविध क्लासेसला अभ्यास करतात. मात्र, त्याचा परिणाम शहरातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये होत आहे. त्यामुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील, सचिव प्रा. गणेश शिंदे, देवगिरीचे उपप्राचार्य प्रा. सुरेश लिपाने, प्रा. नंदकिशोर गायकवाड, स.भु. विज्ञानचे प्रा. संजय गायकवाड, विवेकानंदचे प्रा. प्रदीप पाटील, मौलाना आझादचे प्रा. रशीद खान, छत्रपती महाविद्यालयाचे प्रा. भरत वहाटुळे, वसंतराव नाईकचे प्रा. एस.बी चव्हाण, डॉ. भारत खैरनार आणि भारत साेनवणे यांनी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांची भेट घेऊन ११ वी उत्तीर्णतेचे टीसी मागणाऱ्या विद्यार्थ्यांना पायबंद घालण्याची मागणी केली आहे.

७० शिक्षक झाले अतिरिक्तजिल्ह्यात अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ९५ एवढी आहे. त्यातील ४० कनिष्ठ महाविद्यालये छत्रपती संभाजीनगर शहरात आहेत. या महाविद्यालयात ६५० शिक्षक कार्यरत होते. त्यापैकी मागील वर्षी विद्यार्थी संख्या घटल्यामुळे ७० शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यात एकट्या स. भू. कनिष्ठ महाविद्यालयातील २० शिक्षकांचा समावेश आहे.

२५० पेक्षा अधिक स्वयंअर्थसहाय्यीत कनिष्ठ महाविद्यालयेजिल्ह्यात २५० पेक्षा अधिक स्वयं अर्थसहाय्यीत उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यात १५० शहरांत आहेत. या महाविद्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. शिक्षकांच्या नेमणुका केलेल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांची प्रचंड तूट असल्याचे वारंवार समोर येत आहे.

अकरावी उत्तीर्णतेच्या टीसीसाठी विद्यार्थ्यांचे अर्जमहाविद्यालय..........................अर्जांची संख्यादेवगिरी.....................................५००विवेकानंद..................................२००स.भू.विज्ञान................................१००मौलाना आझाद...........................१५०मिलिंद विज्ञान...............................७०छत्रपती कॉलेज ........................................१५०वसंतराव नाईक............................ ८०डॉ.आंबेडकर वाणिज्य....................४०मिलिंद कला..................................७०

क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास कारवाईग्रामीण भागामध्ये असलेल्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय मंडळाच्या पातळीवर परीक्षेसाठी तालुका पातळीवरीलच केंद्र देण्याविषयी विचार सुरू आहे तसेच महाविद्यालयांनी विनाकारण अकरावीचा टीसी मागणाऱ्यांना टीसी देऊ नये.- अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय