शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शिवसेनेने ‘हद्द’ ओलांडली...!

By admin | Updated: September 15, 2015 00:37 IST

औरंगाबाद : झालर क्षेत्रातील २८ पैकी २६ गावे मनपा हद्दीत समाविष्ट करण्याचा अशासकीय प्रस्ताव सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता.

औरंगाबाद : झालर क्षेत्रातील २८ पैकी २६ गावे मनपा हद्दीत समाविष्ट करण्याचा अशासकीय प्रस्ताव सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत सभा सुरू असताना या प्रस्तावाला भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि एमआयएम या पक्षांनी कडाडून विरोध दर्शविला. सर्व राजकीय पक्षांचा विरोध झुगारून शिवसेनेने ठराव मंजूर केला.दोन दिवसांपूर्वीच महापौर त्र्यंबक तुपे यांनी झालर क्षेत्रातील २६ गावे मनपा हद्दीत समाविष्ट करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली होती. ही मागणी शासन दरबारी पोहोचेपर्यंत महापौरांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत ऐनवेळी झालरच्या २६ गावांचा अशासकीय प्रस्तावही आणला. या प्रस्तावावर रात्री उशिरा सभेत जोरदार चर्चा झाली. सेनेचे नगरसेवक राजू वैद्य यांनी झालरच्या २६ गावांसोबत वाळूज एमआयडीसीही मनपात घ्यावी. जेणेकरून मनपाला आर्थिक लाभ मिळेल. भाजपचे स्थायी समितीचे माजी सभापती राजू शिंदे यांनी प्रस्तावाची अक्षरश: चिरफाड केली. सिडकोसारख्या व्यावसायिक संस्थेलाही झालरचा विकास परवडत नाही. शहरातील ११३ वॉर्डांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आजही मनपा मूलभूत सोयी-सुविधा देऊ शकत नाही. ज्या नागरिकांनी आपल्याला निवडून दिले आहे, त्यांच्यावर अन्याय करणारा हा प्रस्ताव आहे. झालरचा विकास डीएमआयसीत करावा. मनपा हद्दीत या गावांना घेतल्यास २० बाय ३० सारखी बकाल अवस्था होईल. काँग्रेसचे नगरसेवक भाऊसाहेब जगताप, एमआयएमचे अब्दुल रहीम नाईकवाडी, गजानन बारवाल यांनी कडाडून विरोध केला. सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी २६ गावांच्या विकासासाठी मनपाकडे काही ब्ल्यू प्रिंट आहे का, अशी विचारणा केली. त्याचे प्रेझेंटेशन सभागृहात दाखविण्यात यावे. तत्पूर्वी हा विषय मंजूर करण्यास आपण अनुमोदन देत असल्याचे सांगितले. महापौरांनी एकतर्फी निर्णय घेत ठरावाला मंजुरी दिली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर येऊन विरोधही केला. मात्र, काहीच उपयोग झाला नाही.झालर क्षेत्रात शहरातील अनेक व्यावसायिकांनी जागा घेऊन ठेवल्या आहेत. ही गावे मनपा हद्दीत नसल्यामुळे गृह व्यावसायिकांना मागील काही दिवसांपासून त्रास सहन करावा लागत आहे. ४झालरमधील गावे एकदा मनपा हद्दीत आल्यास जमिनींच्या कि मती आकाशाला गवसणी घालतील. गृहप्रकल्पांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. झालरमध्ये राहणाऱ्या नागरिकांबद्दल मनपाला किंचितही सहानुभूती नाही. ४व्यावसायिकांचा फायदा लक्षात घेऊन हा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले.