शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामुळे सेनेचे पाणी-पाणी

By admin | Updated: January 7, 2015 01:04 IST

औरंगाबाद : भाजपाने समांतर जलवाहिनीच्या योजनेवरून सुरू केलेल्या राजकारणामुळे शिवसेनेचे पाणी-पाणी झाले आहे.

औरंगाबाद : भाजपाने समांतर जलवाहिनीच्या योजनेवरून सुरू केलेल्या राजकारणामुळे शिवसेनेचे पाणी-पाणी झाले आहे. त्या योजनेच्या कराराची चिरफाड होण्याच्या भीतीमुळे मनात नसतानाही महापौर कला ओझा यांनी अखेर १३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा. विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केल्याचे वृत्त हाती आले आहे. विशेष म्हणजे या सभेसाठी शिवसेना व स्थायी समिती सदस्यांच्या पत्रावरून सभा न घेता भाजपा सदस्यांनी दिलेल्या सभेच्या मागणी पत्रावरून शिवसेनेने हा ‘विशेष’ निर्णय घेतला आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर त्या योजनेचे काम घेतलेल्या कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे आणि मनपाच्या हातवरच्या करण्याच्या भूमिकेमुळे जनतेत तीव्र असंतोष निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भाजपाने तो असंतोष राजकीय श्रेयात परिवर्तित करण्यास सुरुवात केल्याने शिवसेनेने भाजपाच्या मागणीनुसार सभा घेण्यासाठी पाऊल उचलल्याने सेनेने एक प्रकारे नांग्या टाकल्या आहेत. भाजपाच्या सदस्यांनी मागणी केल्यानंतर समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. परिणामी शिवसेना सदस्यांमध्ये व सभापती विजय वाघचौरे यांच्या नाराजीचा सूर उमटला आहे. स्थायी समिती सदस्यांच्या मागणीनुसार सभा झाली असती तर पक्षाला फायदा झाला असता, असे सेनेच्या सदस्यांना व जैस्वाल यांना वाटत होते; परंतु सेनेतील काही हेकेखोर नेत्यांना ती सभा होऊच नये असे वाटत होते. भाजपाच्या पत्रासमोर आता सेनेतील समांतरपे्रमी गटाने नांग्या टाकल्या असल्या तरी अजूनही त्यांनी ती सभा होऊ नये असे त्यांना वाटते आहे.