शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

भंगार,निरुपयोगी साहित्याचा नगर पालिकेत खच !

By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST

उस्मानाबाद : शहराचा कारभार हाकणाऱ्या नगर पालिकेला गत काही दिवसांपासून कचराकुंडीसारखे स्वरूप आले आहे़

उस्मानाबाद : शहराचा कारभार हाकणाऱ्या नगर पालिकेला गत काही दिवसांपासून कचराकुंडीसारखे स्वरूप आले आहे़ कर आकारणी, बांधकाम परवाना विभागासह सुवर्ण जयंती विभागातील कर्मचाऱ्यांना कचऱ्यात बसूनच कारभार हाकावा लागत आहे़ तर छतावर लाखो रूपयांचे पथदिव्याचे साहित्य उघड्यावरच ठेवण्यात आले आहे़ शिवाय स्वच्छ शहराचे स्वप्न रंगविणाऱ्या पालिकेच्या भिंतींनाच आता पिचकाऱ्यांचे रंग चढू लागले आहेत़
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद नगर पालिकेने कॅरीबॅगमुक्त शहर, स्वच्छ शहर आदी कौतुकास्पद उपक्रम हाती घेतले आहेत़ पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी हे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले असले तरी याला मूर्त रूप देण्याकडे पदाधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले असून, अधिकाऱ्यांचाही कानडोळा आहे़ त्यामुळे कर्मचारी ‘हम करे सो कायदा’ असे म्हणत काम करताना दिसतात़ व्यापारी महासंघाला सोबत घेऊन पालिकेने कॅरीबॅग मुक्त शहर बनविण्याचा निर्णय घेतला़ प्रारंभीच्या काळातील कारवाई वगळता नंतर कोणतीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही़ स्वच्छ शहराचे तीन-तेरा वाजले आहेत़ त्यामुळे हे उपक्रम आणि त्यांची घोषणाबाजी केवळ नावालाच का ? असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे़
सद्यस्थितीत पालिका इमारतीची प्रवेशद्वारापासून छतापर्यंत कचराकुंडीगत अवस्था झाली आहे़ ठिकठिकाणच्या भिंतींना पिचकाऱ्यांचे रंग चढले आहेत़ स्वच्छ शहराचे स्वप्न पाहणाऱ्या पालिकेच्या भिंतीच रंगलेल्या असतील तर स्वच्छ शहराचे स्वप्न प्रत्यक्षात कधी येणार हाच खरा प्रश्न आहे़ पहिल्या मजल्यावर कर आकारणी, बांधकाम परवाना विभागासह सुवर्ण जयंती विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अशा परिस्थितीत बसून काम करावे लागत आहे़ या विभागाला केलेले पार्टीशनही भंगारागत झाले असून, कपाटातील फायलींवर धूळ चढला आहे़ अनेक ठिकाणी जुन्या फाईली उघड्यावरच टाकण्यात आल्या आहेत़ पालिकेच्या छतावर प्रवेश केल्यानंतर विचित्र परिस्थितीच समोर येते़ छत म्हणजे पूर्णत: कचराकुंडीच ! या छतावर पथदिव्यांचे लाखो रूपयांचे साहित्य उघड्यावर ठेवण्यात आले आहे़
पाऊस आल्यानंतर या साहित्याला जंग चढतो़ त्यातील होल्डर, वायरिंग खराब होते़ जेव्हा गरज पडेल तेव्हा पालिकेच्या तिजोरीतील (पर्यायाने नागरिकांच्या) पैसा खर्च करून होल्डर, वायर बसविण्यात येत आहे़ गेलेल्या ट्यूब मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आल्या असून, फुटलेल्या ट्यूबांचे काच ठिकठिकाणी पडले आहेत़ एकूणच शहरवासियांना मोठ-मोठी स्वप्ने दाखवित अंगणातील घाणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार कोण अशी चर्चा रंगू लागली आहे़ (प्रतिनिधी)
दुपारी कार्यालये ओस
कार्यालयीन वेळेत दुपारी ‘पोटपूजे’साठी सुटी झाली की, कर्मचारी नंतर कार्यालयात येतील की नाही याचा पत्ता पदाधिकाऱ्यांना सोडाच अधिकाऱ्यांनाही लागत नाही़ ते कोठे गेले होते याची विचारणा करण्यास कोणासही वेळ नाही़ त्यामुळे दुपारनंतर पालिकेतील बहुतांश कार्यालये ओस दिसून येतात़ त्यामुळे कामकाजासाठी दिवसातून दोन-तीन चकरा मारल्याशिवाय त्यांचे काम होत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत़
लिलाव होणे गरजेचे
पालिका इमारतीच्या प्रवेश द्वारापासून ते छतापर्यंत ठिकठिकाणी लाखो रूपयांचे साहित्य भंगारागत पडले आहे़ यातील भंगार साहित्याचा लिलाव वेळेवर होण्याची गरज आहे़ पालिकेतील साहित्य सुरक्षित राहते, मात्र बाहेर पडलेल्या साहित्यावर चोरट्यांचा नेहमीच डोळा असतो़ त्यामुळे भंगाराचा लिलाव करून वेळेत केल्यानंतर पालिकेच्याच तिजोरीत त्यातून भर पडणार आहे़ त्यामुळे भंगाराची लिलावातून विक्री करावी, अशी मागणी होत आहे़
स्वच्छतागृहाचा अभाव
जिल्ह्याच्या मुख्यालयाची नगर पालिका असतानाही याठिकाणी स्वच्छता गृहाचा मोठा अभाव आहे़ त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या आवारातच आडोसा शोधावा लागतो़ परिणामी विशेषत: महिला वर्गाची मोठी कुचंबणा होत आहे़ असे असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी संबंधितांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह येथे विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांमधून होत आहे़