शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या झळा तीव्र; टँकरने गाठले शतक

By admin | Updated: April 1, 2015 00:56 IST

जालना : जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांना ११३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात अंबड तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकरने बदनापूर तालुक्यात २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

जालना : जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांना ११३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात अंबड तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकरने बदनापूर तालुक्यात २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील २२८ गावांसाठी २२६ विहिरी अधिग्रहन करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढावलेली आहे. कमी पावसामुळे या वर्षी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. तसेच काही ठिकाणी धरणेही कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांमधील २ लाख ९ हजार ८५४ ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. या लोकांसाठी प्रशासनाने ११३ टँकरद्वारे २५८ खेपा करून पाणी पुरवठा सुरू केला आहे.जालना तालुक्यातील विरेगाव, सोलगव्हाण, नेर, डुकरी पिंप्री, सेवली, वरखेडा, मोती गव्हाण, एरंडवडगाव या सात गावांत १० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच ५९ गावांसाठी ६१ विहिरींचे अधिग्रहन करण्यात आले.बदनापूर तालुक्यात २१ गावे आणि ६ वाड्यांना २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात रोषणगाव, धोपटेश्वर, बदनापूर, दगडवाडी, दुधनवाडी, कडेगाव, वाघु्रळ, बाजार वाहेगाव, देव पिंपळगाव, राजेवाडी, वंजारवाडी, ढोकसाळ, अकोला, भाकरवाडी, मांजरगाव, वरूडी, शेलगाव, वाकुळणी, मेहुणा, चिखली या गावांचा समावेश आहे. तसेच तालुक्यातील ३८ गावांसाठी ४० विहिरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे.भोकरदन तालुक्यातील सावरखेडा, तळेगाववाडी, विटा, रामनगर, पिंप्री, पळसखेडा लोणगाव, या पाच गावात सात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. तसेच सात विहिरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. जाफराबाद तालुक्यातील भातोडी, ठोकवाडी, कुंभारी, पापळ, दुनगाव, यागावात पाच टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे. तसेच ८ विहीरीचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. परतूर तालुक्यात मागील आठवड्यापर्यंत एकही टँकरर सुरू नव्हते. या आठवड्यात तालुक्यातील सुरूमगाव येथे एका टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. तर तालुक्यातील १० गावांसाठी ९ विहिरींचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.मंठा तालुक्यातील मंठा शहर, हिवरखेडा, पांगरी गोसावी, कंठाळा, गुलखंड या पाच गावात पाच टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच ५ विहीरीचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, मच्छिंद्रनाथ चिंचोली, राणी उंचेगाव, रवना, राहेरा, राहेरातांडा, बाहिरगाव, शिंदे वडगाव, पांडोळी, देव हिवरा, देवहिवरा वस्ती, देवनगर तांडा, डहाळेगाव, डहाळेगाव तांडा, रांजणी, चित्रवडगाव, भेंडाळा, बोरगाव, बोरगा खुर्द, जांबसमर्र्थ, शिंदखेड तांडा, चित्रवडगाव, बेलगाव, रामगव्हाण खुर्द, या गावांना आणि वाड्यांना २ शासकीय व १६ खाजगी असे १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच ४८ गावांसाठी ४४५विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)