शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सव्वादोनशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 7, 2015 01:25 IST

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारीपासून मार्चअखेरपर्यंत तीन महिन्यांत विभागात तब्बल २२६ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:ची जीवनयात्रा संपवली आहे. या काळात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कमी पावसामुळे मराठवाड्यात सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विभागातील शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. यंदाच्या वर्षी खरिपाचे संपूर्ण पीक पाण्याअभावी हातचे निघून गेले. शिवाय रबीची पेरणीही होऊ शकली. दोन्ही पिकांचे उत्पन्न बुडाले, आता पुढील वर्ष कसे काढायचे ही विंवचना असतानाच अनेकांना त्यांच्याकडील कर्जाच्या वसुलीसाठी सावकार आणि बँकांच्या तगाद्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या सर्वाला कंटाळून अनेक जण आत्महत्या करीत आहेत. विभागात १ जानेवारीपासून मार्चअखेरपर्यंत तीन महिन्यांत २२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात ३८, जालना जिल्ह्यात १२, परभणी जिल्ह्यात १२, हिंगोली जिल्ह्यात ०, नांदेड जिल्ह्यात ३६, बीड जिल्ह्यात ६४, लातूर जिल्ह्यात २० आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ३५५ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागात आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांपैकी १०८ प्रकरणांत संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. २८ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत, तर ९० प्रकरणांची चौकशी अद्याप पूर्ण व्हायची आहे.