शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

गेवराई परिसरात अफवांचे पीक

By admin | Updated: July 4, 2014 00:13 IST

गेवराई : शहरात सात वर्षीय मुलीच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर आता शहरासह परिसरात अफवांचे पीक उतू आले आहे.

गेवराई : शहरात सात वर्षीय मुलीच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर आता शहरासह परिसरात अफवांचे पीक उतू आले आहे. यामुळे पालकांमध्ये भिती पसरली आहे. या धास्तीने काही पालक आपल्या मुलांना शाळेत सोडावयास स्वत:च जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेवराई शहरातील चिंतेश्वर गल्ली येथील इशा मोरया ही सात वर्षीय मुलगी शनिवारपासून गायब होती. या मुलीचा मृतदेह सोमवारी चिंतेश्वर मंदिर परिसरात अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ही घटना नरबळी असल्याचे येथील नागरिक चर्चा करीत आहेत. अद्याप या प्रकरणातील आरोपींचा पोलीस शोध घेत असले तरी शहरासह परिसरात आता अफवांचे पीक पसरू लागले आहे. शहरासह परिसरात अफवा झपाट्याने पसरत आहेत. यास मोबाईलही कारणीभूत ठरत आहेत. शहरातील इस्लामपूरा भागात सोमवारी एक मनोरुग्ण महिला फिरताना नागरिकांपा आढळून आली. यानंतर तेथील नागरिकांनी सदरील महिलेस पोलीसांच्या ताब्यात दिले. ही घटना खरी असली तरी, या घटनेनंतर पुन्हा एक बाई दोन मुलांना घेऊन जात असल्याची अफवा शहरभर पसरली. यानंतर लगेच अनेक नागरिकांनी एकमेकांना फोन करून विचारले की, महिला कोण होती? कोणाच्या मुलांना घेऊन चालली होती? तिला पोलीसांच्या ताब्यात दिले का? असे एक ना अनेक प्रश्न एकमेकांना फोनवरून विचारले जात होते. ही घटना नंतर केवळ अफवाच असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. मात्र, तोपर्यंत अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. गेवराई शहरासह परिसरातील ग्रामस्थांमध्ये अजुनही भितीचे वातावरण आहे. इशा मोरया खून प्रकरणातील गूढ उलगडत नसल्याने अफवांमध्ये वाढ होत आहे. या अफवांविषयी शहरातील महिला रस्त्या-रस्त्यावर चर्चा करताना दिसून येत आहेत. अफवांमुळे पालकांमध्ये सर्वाधिक भीती असल्याचे दिसून येत आहे. अनेक पालक आपल्या पाल्याला शाळेत ने-आण करीत आहेत. यासाठी अनेकांनी ठरावीक रिक्षाचालकांना सांगितले आहे. मात्र, असे असले तरी नसता धोका नको म्हणून ने-आण करण्याचे काम पालक स्वत:च करीत आहेत. (वार्ताहर)अफवांवर विश्वास ठेवू नकागेवराई शहरासह परिसरातील अफवांविषयी गेवराई ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शेख चॉँद म्हणाले की, इशा मोरया खून प्रकरणी पोलीस शोध घेत आहेत. आरोपी पकडल्यानंतर घटना कशामुळे घडली हे समोर येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवाही पसरवू नयेत. काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांना कळवावे असे आवाहनही शेख यांनी केले.अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करागेवराई शहरात सध्या विनाकारण अफवा पसविण्यात येत आहेत. अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईची मागणी अजय दाभाडे, याहीया खान, अक्षय पवार यांनी केली आहे.