शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

आरटीई अ‍ॅक्ट अ‍ॅपचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:04 AM

आरटीई प्रवेश प्रक्रिया सहज व सुलभ व्हावी म्हणून शिक्षण आरटीई अ‍ॅप तयार करण्यात आले; परंतु ते अ‍ॅप अद्यापही कार्यान्वित झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क कायद्याचे अ‍ॅप बंद असल्याने सध्या पालकांना मनस्ताप होत आहे. आरटीईद्वारे दिल्या जाणाऱ्या २५ टक्के राखीव जागांसाठी १३ मार्च रोजी पहिल्या फेरीची लॉटरी काढण्यात आली. या प्रवेशासाठी राज्यभरातून जवळपास दोन लाख, तर औरंगाबाद जिल्ह्यातून ५६५ शाळांसाठी ११ हजार १२१ अर्ज प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे नोंद झाली आहे.अ‍ॅप कार्यान्वित नाही...आरटीई प्रवेश प्रक्रिया सहज व सुलभ व्हावी म्हणून शिक्षण आरटीई अ‍ॅप तयार करण्यात आले; परंतु ते अ‍ॅप अद्यापही कार्यान्वित झाले नाही. राज्याच्या शालेय व क्रीडा विभागाच्या वेबसाईटवर आरटीई २५ मोबाईल अ‍ॅप हे गुगल प्ले मधून डाऊनलोड करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले होते. प्रत्यक्षात मागील सहा दिवसांपांसून अनेक पालकांनी हे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे प्रयत्न केले; परंतु खूप प्रयत्न करूनही हे अ‍ॅप डाऊनलोड होत नाही. ‘प्लीज वेट व्हाईल लोडिंग’ एवढीच माहिती मागील सहा दिवसांपासून दाखवत आहे. अँड्रॉईड मोबाईल सर्वत्र आज उपलब्ध आहेत; परंतु आरटीई अ‍ॅप बंद असल्यामुळे पालकांना मात्र मनस्ताप सहन करण्याशिवाय पर्याय उरला नाही. १२ मार्च रोजी झालेल्या सोडतीनंतर अनेक पालकांना आपल्या पाल्याचा नंबर कोणत्या शाळेत लागला किंवा नाही यासंदर्भात लिखित मेसेजही मोबाईलवर प्राप्त झाले नाहीत. शैक्षणिक क्षेत्रात गतिमान करण्यासाठी शासनाचा आरटीई मोबाईल अ‍ॅप योजनेचा सध्या तरी फज्जा उडालेला आहे. यामुळे पालक वर्गात प्रचंड नाराजी आहे.आरटीईमुळे नंबर लागल्यानंतर सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ असतानाही औरंगाबाद शहरातील काही नामांकित शाळा अ‍ॅडमिशन फी, वार्षिक फी व शाळा माहिती पुस्तकांच्या नावाखाली दहा ते पंधरा हजार रुपये सक्तीने वसूल करीत आहेत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. आरटीईअंतर्गत प्रवेश घेतल्यानंतर त्याच दिवशी प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंद आॅनलाईन घेऊन शासनास कळविणे बंधनकारक आहे. पहिली प्रवेशाची फेरी १३ मार्च रोजी झाली. चार दिवसांपासून शासनास कळविण्यात आलेल्या वेबसाईटवर फक्त ८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची नोंद औरंगाबाद जिल्ह्यासाठी दाखविण्यात येत आहे. आरटीई प्रवेशाच्या सर्व फेºया झाल्यानंतर आॅफलाईनने श्रीमंतांच्या पाल्यांना प्रवेश देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रशांत साठे यांनी केला. सर्व प्रवेश फेºया झाल्यानंतर उरलेल्या जागांचे संस्थाचालक काय करतात, हे तपासण्याची यंत्रणा आज तरी शिक्षण विभागाकडे नाही.