शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

औरंगाबादमध्ये पाण्यावर दरोडा; पाणी चोरांवर प्रशासनाचा वॉच,सापडला तर थेट फौजदारी कारवाईच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 19:29 IST

दररोज शेकडो टँकरचा काळाबाजार करण्यात येत होता.

औरंगाबाद : जलकुंभावरून दररोज लाखो लिटर पाणी चोरणाऱ्या टँकर चालकांवर अत्यंत बारकाईने वॉच ठेवण्यात येत आहे. पाण्याचा काळाबाजार करताना जो टँकरचालक पकडल्या जाईल त्यावर थेट फाैजदारी कारवाई करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. त्यामुळे टँकरचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

‘लोकमत’ने १० एप्रिलपासून ‘पाण्यावर दरोडा’ ही वृत्त मालिका प्रसिद्ध करून लोकांचे पाणी पळवतेय कोण ? याकडे लक्ष वेधले. मनपाचा कंत्राटदार व त्याच्या टँकरचालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. दररोज शेकडो टँकरचा काळाबाजार करण्यात येत होता. मागील चार दिवसांपासून यावर बरेच नियंत्रण आल्याचे नवनियुक्त कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कितीही राजकीय दबाव आला तरी प्रशासनाला काहीच फरक पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला. कंत्राटदार एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने अधिकारी व कर्मचारी सध्या त्याच्या विरोधात अत्यंत सावध भूमिका घेत आहेत.

कार्यकारी अभियंता यांना थेट प्रश्नप्रश्न - टँकरद्वारे आजपर्यंत सुरू असलेली पाण्याची चोरी प्रशासनाला मान्य आहे का?कोल्हे - अजून तरी प्रशासनाने चोरी पकडलेली नाही. आमच्या निदर्शनासही आलेली नाही. मी नुकताच पदभार स्वीकारला असल्याने माहिती घेतोय, जलकुंभावर ठाण मांडून बसतोय. काही राजकीय मंडळींचे सुरू असलेले टँकर मात्र बंद करण्यात आले. यंत्रणेवर नियंत्रण नसेल तर थोड्या फार गोष्टी होत असतात.

प्रश्न- पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही?कोल्हे- रंगेहाथ पकडल्याशिवाय कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या दिवशी पकडल्या जाईल, त्या दिवशी कारवाई अटळ आहे. प्रशासक कोणालाही सोडणार नाहीत. चुकीच्या गोष्टीला प्रशासन कधीच पाठीशी घालणार नाही.

प्रश्न- चोरी रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययाेजना यशस्वी होतील का?कोल्हे- जीपीएस, व्हेईकल ट्रॅकिंग, क्युआर कोड या गोष्टींमुळे खूप फरक पडणार आहे. एकही टँकर चुकीचा जाणार नाही. स्मार्ट सिटी त्यावर वॉच ठेवणार आहे. आमूलाग्र बदल यशस्वी होतील.

प्रश्न- कारवाईसाठी प्रशासनावर राजकीय दबाव आहे का?कोल्हे- दबाव कोणाचाही नाही. सध्या टँकर प्रक्रियेवर आम्ही वॉच ठेवून आहोत. कोणी चुकीच्या पद्धतीने वागताना आढळून आला तर त्याला माफी नाहीच.

प्रश्न- सर्वसामान्यांना वाढीव पाणी मिळेल का?काेल्हे- टँकरला दररोज जेवढे पाणी लागत आहे, तेवढे द्यावेच लागेल. यामध्ये कोणी खोटं सांगून टँकर नेत असतील तर ते बंद होतील. नागरिकांना खूप काही वाढीव पाणी मिळेल असे नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका