शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

महसूलचा संप सर्वसामान्यांच्या मुळावर

By admin | Updated: August 6, 2014 02:30 IST

उस्मानाबाद : जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी मागील पाच दिवसापासून संप केला आहे.

उस्मानाबाद : जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी मागील पाच दिवसापासून संप केला आहे. मंगळवारी या आंदोलनात तहसिलदार, नायब तहसिलदारांनीही उडी घेतल्याने जिल्हाभरातील प्रशासन ठप्प झाले आहे. ग्रामिण भागातील हजारो नागरिक, विद्यार्थी आपल्या विविध कामासाठी तहसिल कचेरीत आले होते. कार्यालयाला टाळे पाहून त्यांची निराशा झाली. दरम्यान, हजारावर विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे सेतु सुविधा केंद्रात अडकल्याने या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी ताटकळावे लागत आहे.नायब तहसिलदारांना ग्रेड-पे वाढवून रुपये ४६०० रुपये करावा, महसूल विभागातील लिपीकाचे पदनाम बदलून त्याला महसूल सहाय्यक असे पदनाम द्यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका मुलाला खात्यामध्ये नौकरीसाठी सहानुभूतीपुर्वक विचार करावा, महसूल विभागातील नायब तहसिलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरावीत या व इतर मागण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १ आॅगष्टपासून हे बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. मंगळवारी जिल्ह्यातील तहसिलदार व नायब तहसिलदारांनी या पाठिंबा देत या आंदोलनात उडी घेतल्याने जिल्हाभरातील प्रशासन ठप्प झाल्याचे चित्र होते. संपामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे नविन अर्ज स्वीकारण्याचे काम रखडले आहे. मागील सहा महिन्यांपासून रेशन दुकानावर साखर नव्हती. सध्या साखर आली आहे. परंतू महसुल अधिकारी संपावर गेल्याने पुढील प्रक्रिया रखडली आहे. जीवनदायी योजनेच्या कार्ड वाटपालाही या संपाचा फटका सोसावा लागला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचार घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात सद्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील विविध सेतु सुविधा केंद्राकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्याची दिनांक पोचपावतीवर देण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारी अनेक विद्यार्थी जिल्ह्यातील तहसिल कार्यालयाबाहेर जमले होते. मात्र संपामुळे या विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळू शकली नाहीत. या विद्यार्थ्यांना मुदतीत प्रमाणपत्र सादर करता न आल्यास त्यांना महाव्यिालयीन प्रवेशापासून वंचित रहावे लागण्याची भिती अनेक विद्यार्थी व्यक्त करीत होते.