शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधांच्या आधी लग्नाच्या ५०० पत्रिका वाटल्या, आता शंभरात कोणाला बोलविणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 11:55 IST

नातेवाईकांचा राग शांत करण्यात लागले वधू- वर पिता

औरंगाबाद : आम्ही ५०० निमंत्रितांच्या यादीत तुमचा समावेश केला होता ; पण ओमायक्रॉनमुळे बंधन आल्याने आम्हाला नाईलाजाने आपले नाव वगळावे लागत आहे, क्षमा करावी, तुमच्या उपस्थितीने आणखी आनंद वाढला असता.. पण तुम्ही घरूनच वधू- वराला आशीर्वाद द्या.. त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपले आशीर्वाद मौल्यवान आहेत... असे संदेश वधू- वर पित्यांकडून नातेवाईक, मित्र, हितचिंतकांच्या मोबाईलवर जात आहेत.

कारण, अनेकांच्या मुला- मुलीचे विवाह जानेवारीत आहेत. त्यांनी ५०० पेक्षा अधिक पत्रिका वाटल्या ; पण उपस्थितीवर निर्बंध आल्याने सर्व नियोजन बिघडले आहे.

बंदिस्त सभागृहात १०० पेक्षा जास्त नकोमंगल कार्यालयात बंदिस्त सभागृहात १०० लोकांपेक्षा जास्त संख्या असता कामा नाही, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यामुळे ज्यांनी १०० पेक्षा अधिक पत्रिका वाटप केल्या आहेत, ते अडचणीत आले आहेत.

खुल्या जागेत ५० टक्के क्षमतालॉनवर म्हणजे खुल्या जागेत २०० किंवा क्षमतेच्या ५० टक्केच लोक असावेत, असे बंधन असल्याने वधू- वराचे वडील जास्त अडचणीत आले आहेत. कारण आधी निमंत्रण दिले, आता येऊ नका म्हणतात, म्हणजे अपमान केला अशी भावना नातेवाईकांमध्ये निर्माण होत आहे.

मंगल कार्यालयांच्या अडचणी वाढल्याआता कुठे लग्न उद्योग रुळावर आला असताना पुन्हा निर्बंध लावण्यात आल्याने मंगल कार्यालय व्यावसायिक अडचणीत आले आहेत. कारण अगोदरच डिपॉझिट घेऊन ठेवले आहे. लोकांची जास्त संख्या झाली तर प्रशासन कारवाई करेल ही भीती आहे, असे मंगल कार्यालयाच्या मालकांनी सांगितले.

वधू- वर पित्यांना धडकीएका वधू पित्याने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये मी जानेवारीतील लग्नाची तारीख बुक केली होती. ४५० पत्रिका वाटल्या होत्या. मात्र मंगळवारी मंगल कार्यालयाच्या मालकाचा फोन आला. १०० लोक तर आमच्या परिवारातील होतात ; मग कोणाची नावे कमी करावीत, हा यक्षप्रश्न पडला आहे. एका वर पित्याने सांगितले की, माझ्या एकुलत्या एक मुलाचे लग्न थाटात लावावे ही आमची इच्छा. पण आता निर्बंध आल्याने काही जणांना आदल्या दिवशी तर काही जणांना लग्नाच्या दिवशी तर काही जणांना सत्यनारायणाच्या दिवशी बोलाविण्याची तडजोड करावी लागली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarriageलग्न