शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

निर्बंधांच्या आधी लग्नाच्या ५०० पत्रिका वाटल्या, आता शंभरात कोणाला बोलविणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 11:55 IST

नातेवाईकांचा राग शांत करण्यात लागले वधू- वर पिता

औरंगाबाद : आम्ही ५०० निमंत्रितांच्या यादीत तुमचा समावेश केला होता ; पण ओमायक्रॉनमुळे बंधन आल्याने आम्हाला नाईलाजाने आपले नाव वगळावे लागत आहे, क्षमा करावी, तुमच्या उपस्थितीने आणखी आनंद वाढला असता.. पण तुम्ही घरूनच वधू- वराला आशीर्वाद द्या.. त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपले आशीर्वाद मौल्यवान आहेत... असे संदेश वधू- वर पित्यांकडून नातेवाईक, मित्र, हितचिंतकांच्या मोबाईलवर जात आहेत.

कारण, अनेकांच्या मुला- मुलीचे विवाह जानेवारीत आहेत. त्यांनी ५०० पेक्षा अधिक पत्रिका वाटल्या ; पण उपस्थितीवर निर्बंध आल्याने सर्व नियोजन बिघडले आहे.

बंदिस्त सभागृहात १०० पेक्षा जास्त नकोमंगल कार्यालयात बंदिस्त सभागृहात १०० लोकांपेक्षा जास्त संख्या असता कामा नाही, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यामुळे ज्यांनी १०० पेक्षा अधिक पत्रिका वाटप केल्या आहेत, ते अडचणीत आले आहेत.

खुल्या जागेत ५० टक्के क्षमतालॉनवर म्हणजे खुल्या जागेत २०० किंवा क्षमतेच्या ५० टक्केच लोक असावेत, असे बंधन असल्याने वधू- वराचे वडील जास्त अडचणीत आले आहेत. कारण आधी निमंत्रण दिले, आता येऊ नका म्हणतात, म्हणजे अपमान केला अशी भावना नातेवाईकांमध्ये निर्माण होत आहे.

मंगल कार्यालयांच्या अडचणी वाढल्याआता कुठे लग्न उद्योग रुळावर आला असताना पुन्हा निर्बंध लावण्यात आल्याने मंगल कार्यालय व्यावसायिक अडचणीत आले आहेत. कारण अगोदरच डिपॉझिट घेऊन ठेवले आहे. लोकांची जास्त संख्या झाली तर प्रशासन कारवाई करेल ही भीती आहे, असे मंगल कार्यालयाच्या मालकांनी सांगितले.

वधू- वर पित्यांना धडकीएका वधू पित्याने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये मी जानेवारीतील लग्नाची तारीख बुक केली होती. ४५० पत्रिका वाटल्या होत्या. मात्र मंगळवारी मंगल कार्यालयाच्या मालकाचा फोन आला. १०० लोक तर आमच्या परिवारातील होतात ; मग कोणाची नावे कमी करावीत, हा यक्षप्रश्न पडला आहे. एका वर पित्याने सांगितले की, माझ्या एकुलत्या एक मुलाचे लग्न थाटात लावावे ही आमची इच्छा. पण आता निर्बंध आल्याने काही जणांना आदल्या दिवशी तर काही जणांना लग्नाच्या दिवशी तर काही जणांना सत्यनारायणाच्या दिवशी बोलाविण्याची तडजोड करावी लागली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarriageलग्न