शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्साईज अपील’ अहवाल मागितला

By admin | Updated: September 16, 2014 01:36 IST

मुजीब देवणीकर ,औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबादेतील केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाचे अपील आयुक्तालय नागपूर येथे हलविण्याचा खळबळजनक

मुजीब देवणीकर ,औरंगाबादमराठवाड्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबादेतील केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाचे अपील आयुक्तालय नागपूर येथे हलविण्याचा खळबळजनक निर्णय केंद्र शासनाने घेतला होता. या निर्णयाला उद्योजक संघटना आणि सेवाकरदात्यांनी कडाडून विरोध दर्शविला होता. त्यामुळे केंद्राने अपील कार्यालय औरंगाबादेतच ठेवण्यासंदर्भात अहवाल मागितला आहे.दहा वर्षांपूर्वी अथक परिश्रम करून केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाचे अपील आयुक्तालय मिळविण्यात आले होते. कारण नसताना केंद्र शासनाने कार्यालय थेट नागपूर येथे हलविण्याचा अध्यादेश काढला. यासंदर्भात ‘लोकमत’ने आॅगस्ट महिन्यात दोन वेळेस सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर सीएमआयएसह इतर औद्योगिक संघटनांनीही केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. अपील आयुक्तालय औरंगाबादेतच ठेवण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली.औद्योगिक संघटनांनी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि मागणीचे निवेदनही केंद्र शासनाकडे सादर केले. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादेतील कार्यालय नागपूरला हलविण्यात येऊ नये, अशी सातत्याने मागणी करण्यात येत होती. दरम्यान, केंद्र शासनाने केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाच्या औरंगाबाद कार्यालयाला कळविले की, यासंदर्भात सविस्तर अहवाल द्यावा. या अहवालावरच औरंगाबादेत अपील आयुक्तालय ठेवायचे किंवा नाही, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उद्योजक उल्हास गवळी यांनी सांगितले.केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाकडून दोन महत्त्वाची कामे करण्यात येतात. एक म्हणजे स्थानिक उद्योगांकडून तयार होणाऱ्या मालावर अबकारी कर लावणे. दुसरे म्हणजे परदेशातून येणाऱ्या मालावर आयात शुल्क वसूल करणे. 2सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सेवा देणाऱ्यांवर सेवाकर लावणे. सेवाकर ज्याला अमान्य असेल किंवा जास्त असल्यास त्याला अपील करण्याची संधी असते. त्यासाठी दहा वर्षांपूर्वी ‘कमिशनर अपील’ कार्यालय आणले होते. पूर्वी मराठवाड्यातील सेवाकरदात्यांना अपिलासाठी मुंबईला जावे लागत होते.3औरंगाबादेतील अपील कार्यालयात दरमहा दिडशेहून अधिक अपील दाखल होत असत. आता अपील करणाऱ्यांना आणि त्यांच्या वकिलांना नागपूर कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतील. 4दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचे काम सुरू झाले असून, भविष्यात औरंगाबादेत उद्योगांची संख्या भरपूर वाढणार आहे. अपील कार्यालय नागपूरला हलविण्याचा निर्णय झाल्यास उद्योजकांना त्रास सहन करावा लागेल.