शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

मराठवाड्यात ऊसबंदीचा अहवाल सबुरीने घेण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 16:44 IST

६४ साखर कारखाने, दीड लाख शेतकऱ्यांचा प्रश्न

ठळक मुद्देशिफारशीवेळी विश्वासात घेतले नाही  उसासाठी ठिबक सिंचन पद्धती सक्तीने राबवावीदारू कारखाने बंद  करण्याचा प्रस्ताव का नाही

औरंगाबाद : मराठवाड्यात ऊसबंदी लागू करण्यासंबंधीचा अहवाल विभागीय आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मात्र पीक पद्धतीत बदल करणे सोपे नसल्याने तसेच कारखानदारीवर राजकारण अवलंबून असल्याने या निर्णयाला प्रचंड विरोध होण्याची शक्यता आहे. यात विधानसभेच्या निवडणुकाही तोंडावर आहेत. उसाचे उत्पादन घेणारे सुमारे दीड लाख शेतकरी आहेत. यामुळे या मोठ्या व्होट बँकेला धक्का लावणे राजकीयदृष्ट्या परवडणारे नसल्याने सबुरीने घ्या, असा सल्लाही दिल्या गेल्याचे कळते. शिवाय उसासाठी ठिबक सिंचन पद्धती सक्तीने राबवावी, असा विचार काहींनी मांडला आहे. 

मराठवाड्यातील ३ लाख १३ हजार हेक्टरवर ऊस पिकवला जातो. त्यास २१७ टीएमसी एवढे पाणी लागते.  मराठवाड्यात ६४ साखर कारखाने आहेत. अहवालानुसार १ एकर ऊस पिकविण्यासाठी १ कोटी लिटर पाणी लागते. एक टन साखरेचे उत्पादन करण्यासाठी अडीच लाख लिटर पाण्याची गरज असते. ऊस लागवडीवर बंदी घातली तर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल. ते पाणी तेलबिया किंवा डाळ वर्गीय पिकांना दिले तर ३१ लाख हेक्टर क्षेत्राला त्याचा फायदा होऊ शकतो. हा अहवाल विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठविला आहे.मात्र, विधानसभेच्या तोंडावर असा कोणताही निर्णय घेणे सरकारला परवडणारे नाही. मराठवाड्यातील ६४ साखर कारखाने सर्व पक्षांच्या नेत्यांचेच आहेत.  यापूर्वी मराठवाड्यात ऊस पीक नको, असा अहवाल दिलेला आहे. पण त्यावर निर्णय झाला नाही.

मराठवाड्यातील साखर उद्योगाचे अर्थकारण४७ साखर कारखाने, १०० कोटींची प्रत्येकी गुंतवणूक, ४७०० कोटींतून उभे आहेत कारखाने.दीड लाख थेट रोजगार,  कारखान्यांतून सुमारे साडेआठ लाख अप्रत्यक्ष रोजगार 

विभागीय आयुक्तांनी केलेल्या शिफारशीसरकारने ऊस गाळपासाठी परवानगी देऊ नये. दिल्यास १०० टक्के ठिबक सिंचनावरील ऊस वापरणे बंधनकारक करावे. नदीपात्रातून ऊस पिकाला पाणी देण्यावर बंधन आणावे. इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर दी सेमी अ‍ॅरिड ट्रॉपिक्स या संस्थेच्या संशोधनानुसार मराठवाड्यावर वातावरण बदलाचा परिणाम होत आहे. ठिबक सिंचन बंधनकारक केल्यास ३ हजार ८० दशलक्ष घनमीटर पाणी वाचेल. मराठवाड्यात पर्जन्यमान कमी होत चालले आहे. मागील काही वर्षांत ७० टक्क्यांच्या पुढे पाऊस झालेला नाही. १० वर्षांत हेक्टरी ८७ मेट्रिक टनावरून ५७ मेट्रिक टनावर उत्पादन आले आहे. 

दारू कारखाने बंद  करण्याचा प्रस्ताव का नाहीउसाला जसे जास्त पाणी लागते, तसेच एक लिटर दारू तयार करण्यासाठी २४ लिटर पाणी लागते. मग विभागीय आयुक्तांनी ऊसलागवडीवर बंदी आणण्याचा प्रस्ताव पाठविला, तसेच औरंगाबादेतील दारूचे कारखाने बंद करण्याचा प्रस्ताव का नाही पाठविला.जर उसावर बंदी आणली, तर गुरांच्या चाऱ्याचा भीषण प्रश्न निर्माण होईल. याकडे प्रशासन का बघत नाही. उसाच्या बदल्यात त्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देणारे पीक किंवा योजना आणा अन् मगच बंदीचा प्रस्ताव पाठवा. शेतकऱ्यांना दुप्पट दाम द्या, ते डाळ व तेलबिया उत्पादन घेतील, याचा विचार होणे आवश्यक आहे.                   - विजय अण्णा बोराडे, शेतीतज्ज्ञ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMarathwadaमराठवाडाWaterपाणीDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयagricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद