शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित प्रकल्पांची कामे निकाली काढा- दानवे

By admin | Updated: September 3, 2015 00:27 IST

जालना : राज्यातील काही भागात व मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, दुष्काळी सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन योग्य

जालना : राज्यातील काही भागात व मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, दुष्काळी सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन योग्य ते निर्णय घेत आहे़ सध्या जिल्ह्यात तीन वर्षांपासून काही प्रकल्प तांत्रिक कारणामुळे रखडलले असून प्रलंबित प्रकरणे सुरळीतपणे सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तात्काळ कामाला लागावे, असे आदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रलंबित प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी ए़ एस़ आऱ नायक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भारत कदम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शोभा ठाकूर, जिल्हा नियोजन अधिकारी रविंद्र जगताप, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जालन्याचे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य ए.जी़ ताठे, अधीक्षक अभियंता श्री़शिंदे, बेलापट्टे, तसेच उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व तहसीलदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते़खा. दानवे म्हणाले की, जिल्ह्यातील लघु, साठवण प्रकल्पासाठी शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या होत्या़ काही तांत्रिक कारणामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा रखडलेला आहे़ त्या तांत्रिक बाबीची पूर्तता करुन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा मावेजा त्वरित देण्यात यावा़तसेच योग्य त्या सोईसुविधा देऊन प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन त्वरीत करावे असे नमूद करुन खा. दानवे यांनी जिल्ह्यातील नियोजित दरेगांव येथील ड्रायपोर्ट उभारणीसाठी भू-संपादनाच्या काही अडचणी आहेत. त्या लवकरच जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन ड्रायपोर्टचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत राजूर येथे होत असलेल्या विकास कामांचा आढावाही घेण्यात आला़ जिल्हाधिकारी नायक यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या़ (प्रतिनिधी)जालना : सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खा.रावसाहेब दानवे यांनी राजूर या गावाची काही दिवसांपूर्वी निवड केली आहे. या योजनेंतर्गत राजूर येथील सर्व ग्रामस्थांना आरोग्याविषयी सखोल माहिती व्हावी या उद्देशाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव तसेच जिल्हाधिकारी ए़ एस़ आऱ नायक यांच्या उपस्थितीत वैयक्तिक आरोग्य संचिकेचे विमोचन करण्यात आले़ ४जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संचिका काढण्यात आली असून, या संचिकेमध्ये बालक, पुरुष, स्त्रिया यांच्या आरोग्य तपासणीचा संपूर्ण माहिती मराठी भाषेत विषद करण्यात आली आहे. ही संचिका ग्रामस्थांच्या उपयोगात येईल़ ४या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भारत कदम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शोभा ठाकूर, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जालन्याचे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य ए. जी.ताठे, अमोल गिते, जिल्हा परिषदेचे संबंधित व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते़