शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
7
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
8
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
9
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
10
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
11
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
12
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
13
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
14
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
15
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
16
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
17
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
18
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
19
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
20
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
Daily Top 2Weekly Top 5

खिचडी शिजवण्यातून मुख्याध्यापकांची मुक्तता

By admin | Updated: June 13, 2014 01:11 IST

औरंगाबाद : शालेय पोषण आहाराची खिचडी शिजविण्यासह त्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांची मुक्तता करण्याची गोड वार्ता शालेय शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिली आहे.

औरंगाबाद : शालेय पोषण आहाराची खिचडी शिजविण्यासह त्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांची मुक्तता करण्याची गोड वार्ता शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या प्रारंभीच शालेय शिक्षण विभागाने राज्यातील मुख्याध्यापकांना दिली आहे. या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना बजावले आहेत.
सहसचिव प्रकाश ठुबे यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून मुख्याध्यापकांना योजनेच्या कामातून मुक्त करण्याची मागणी मुख्याध्यापकांच्या संघटनांनी गेल्यावर्षीपासून लावून धरली होती. त्यासाठी संघटनांनी खिचडी शिजवण्यावर बहिष्कारही घातला होता.
ग्रामीण भागातील शाळांत धान्यसाठा सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बचत गटाचीच राहील. तसेच धान्याचा हिशेब बचत गटाने ठेवायचा आहे.
निकृष्ट दर्जाच्या आहाराचा पुरवठा झाल्यास अथवा विषबाधा झाल्यास, शिल्लक माल व नोंदीनुसार मालात तफावत आढळल्यास बचत गटावर कारवाई करण्याबाबतची शिफारस मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालयास करावी. अंतिम कारवाई गटशिक्षणाधिकारी करतील.
याबाबत मुख्याध्यापकाला जबाबदार न धरता चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा, असे हे परिपत्रक नमूद करते.
अन्न शिजवणे, स्वयंपाकांची भांडी, ताटांची सफाई व भोजनानंतर शाळेच्या परिसराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारीही बचत गटावर टाकण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयाचे प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर वालतुरे, जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, प्रशांत हिवरडे आदींनी स्वागत केले असून, आता गुणवत्ता सुधारण्यासाठी मुख्याध्यापकांनी कंबर कसावी, असे आवाहनही केले आहे.
बचत गटावर जबाबदारी
मुख्याध्यापकांना शैक्षणिक कामकाजावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी शासनाने पुढाकार घेत खिचडी शिजवण्यासह व्यवस्थापनाची बाजूही बचत गटावर सोपविली आहे. एवढेच नव्हे तर मुख्याध्यापकांची जबाबदारीतून मुक्तताही करण्यात आली आहे.
या परिपत्रकानुसार शाळांत योजनेचा आहार शिजविण्यासाठी बचत गटांची निवड शाळा व्यवस्थापन समिती करणार आहे, तर स्वयंपाकी, मदतनिसाची निवड संबंधित बचत गट करील. मालाची मागणी नोंदविणे, माल तपासून ताब्यात घेणे व मालाच्या नोंदी घेणे ही कामे बचत गटाकडे सोपविण्यात आली आहेत. बचत गटाने नोंदविलेली मागणी बरोबर असल्याचे मुख्याध्यापक प्रमाणित करतील.