शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

कापसामुळे दुष्काळातही विक्रमी उलाढाल

By admin | Updated: February 1, 2015 00:42 IST

संजय कुलकर्णी , जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन ज्वारीची चाहूल लागली असून येत्या आठवडाभरात त्याची मोठ्या प्रमाणावर आवक होईल,

 

संजय कुलकर्णी , जालनायेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन ज्वारीची चाहूल लागली असून येत्या आठवडाभरात त्याची मोठ्या प्रमाणावर आवक होईल, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. गतवर्षीपेक्षा आवक कमी झाल्याने तुरीचे भाव वधारले आहेत. अपुऱ्या पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादन कमी झाले. त्याचा परिणाम म्हणून बाजारातील मालाची आवकही कमी झाली आहे. पांढरी आणि काळ्या जातीच्या तुरीचे दर ५५०१ रुपयांपर्यंत सारखेच असून लाल तूर ४८५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. ४९६ गव्हाचे दर १७६९ रुपयांपर्यंत तर लोकवन गहू १४६० ते १६०० रुपयांपर्यंत आहेत. शाळू ज्वारी १२०० ते २५००, बाजरी १०५० ते १६५० आणि मका १०५० ते ११६६ रुपयांपर्यंत आला आहे. सोयाबीनचा मागील वर्षी १० क्विंटलपर्यंत उतारा होता. मात्र यावर्षी सोयाबीनचे उत्पादनही कमी झाल्याने त्याचे दर ३२८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेले. गावरान हरभरा २४०० ते ३२६५ रुपयांवर आहे. पिवळा गहू २२०० ते २५०० रुपये आणि लाल गुळ २०८० ते २१९० रुपये प्रतिक्विंटल या दराने विक्री होत आहे. शुक्रवारी जालना बाजार समितीमध्ये सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती बाजार समितीचे सचिव गणेशराव चौगुले यांनी दिली.जालना बाजार समितीच्या आवारात दुष्काळातही सीसीआयकडून कापसाच्या खरेदीमुळे गेल्या आठवड्यात २४ जानेवारी रोजी ७ कोटी २ लाख ४५ हजार रुपयांची विक्रमी उलाढाल झाली. यामध्ये कापसाची खरेदी एकाच दिवशी १४ हजार ५६६ क्विंटल एवढी झाली. त्यापाठोपाठ तुरीची ५७ लाख ९१ हजार रुपये, सोयाबीन १९ लाख ९७ हजार तर ज्वारीची ९ लाख ५८ हजार रुपयांपर्यंत खरेदी-विक्री झाली.