शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रॅमकीचे भूत पुन्हा मनपाच्या मानगुटीवर; २७ कोटी रुपयांच्या मागणीवर न्यायालयाचा शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 13:04 IST

रॅमकी कंपनीचे काम समाधानकारक नसल्याचा ठपका तत्कालीन राजकीय मंडळींनी वारंवार सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला होता.

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलनाचे काम हैदराबाद येथील रॅमकी कंपनीला २००९ मध्ये देण्यात आले होते. कंपनीने अवघ्या दोनच वर्षांत शहरातून गाशा गुंडाळला होता. कंपनीने लवादाकडे दावा दाखल केला होता. २७ कोटी रुपये मनपाने कंपनीला द्यावेत, असा आदेश लवादाने दिला. या आदेशाच्या विरोधात मनपाने जिल्हा न्यायालयात दाद मागितली. न्यायालयानेही लवादाचा निर्णय मान्य केला. त्यामुळे पुन्हा एकदा रॅमकीचे भूत मनपाच्या मानगुटीवर बसले आहे.

शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने रॅमकी कंपनीला दिले होते. २००९ ते २०११ पर्यंत कंपनीने स्वत:ची अत्याधुनिक यंत्रणा लावून काम केले. महापालिकेने आपल्या आस्थापनेवरील कर्मचारीही कंपनीकडे वर्ग केले. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा पगार कंपनीच्या बिलातून कपात करण्यात येऊ लागला. त्यामुळे कंपनी आर्थिक संकटात सापडली. कंपनीनेच महापालिकेला नोटीस देऊन काम बंद करीत असल्याचे सांगितले. महापालिकेने अनेकदा वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. शेवटी कंपनीने गाशा गुंडाळला. महापालिकेने दरमहा देण्यात येणारी बिलेही कंपनीला दिली नाहीत. कोट्यवधी रुपयांची वाहने कंपनीने खरेदी केली होती. त्याचा खर्च द्यावा, अशी मागणी कंपनीने केली. महापालिकेने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे कंपनीने लवादाकडे धाव घेतली. २०१८ मध्ये लवादाने महापालिकेच्या विरोधात निर्णय दिला. कंपनीला २७ कोटी रुपये द्यावेत, असे लवादाने म्हटले होते. लवादाच्या या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाने लवादाचा निर्णय कायम ठेवल्याची माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली. या निर्णयाला खंडपीठात आव्हान देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मनपाचा ठपका कंपनीवरचरॅमकी कंपनीचे काम समाधानकारक नसल्याचा ठपका तत्कालीन राजकीय मंडळींनी वारंवार सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला होता. राजकीय त्रास आणि आर्थिक कुचंबणा यामुळे कंपनीने नोटीस देऊन काम बंद केले होते.

रेड्डीची वाटचाल रॅमकीकडेसध्या शहरातील संपूर्ण कचरा जमा करण्याचे काम हैदराबाद येथील रेड्डी कंपनीकडे आहे. करारात ठरल्यानुसार ही कंपनी अजिबात काम करीत नाही. डोअर टू डोअर कलेक्शनचे काम शंभर टक्के पूर्ण झाले नाही. घंटागाडी येत नसल्याची बाजारपेठेत आणि विविध वसाहतींमध्ये तक्रार आहे. त्यामुळे रेड्डी कंपनीची वाटचालही रॅमकीच्या दिशेनेच सुरू झाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयGarbage Disposal Issueकचरा प्रश्न