शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

रॅमकीचे भूत पुन्हा मनपाच्या मानगुटीवर; २७ कोटी रुपयांच्या मागणीवर न्यायालयाचा शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 13:04 IST

रॅमकी कंपनीचे काम समाधानकारक नसल्याचा ठपका तत्कालीन राजकीय मंडळींनी वारंवार सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला होता.

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलनाचे काम हैदराबाद येथील रॅमकी कंपनीला २००९ मध्ये देण्यात आले होते. कंपनीने अवघ्या दोनच वर्षांत शहरातून गाशा गुंडाळला होता. कंपनीने लवादाकडे दावा दाखल केला होता. २७ कोटी रुपये मनपाने कंपनीला द्यावेत, असा आदेश लवादाने दिला. या आदेशाच्या विरोधात मनपाने जिल्हा न्यायालयात दाद मागितली. न्यायालयानेही लवादाचा निर्णय मान्य केला. त्यामुळे पुन्हा एकदा रॅमकीचे भूत मनपाच्या मानगुटीवर बसले आहे.

शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने रॅमकी कंपनीला दिले होते. २००९ ते २०११ पर्यंत कंपनीने स्वत:ची अत्याधुनिक यंत्रणा लावून काम केले. महापालिकेने आपल्या आस्थापनेवरील कर्मचारीही कंपनीकडे वर्ग केले. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा पगार कंपनीच्या बिलातून कपात करण्यात येऊ लागला. त्यामुळे कंपनी आर्थिक संकटात सापडली. कंपनीनेच महापालिकेला नोटीस देऊन काम बंद करीत असल्याचे सांगितले. महापालिकेने अनेकदा वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. शेवटी कंपनीने गाशा गुंडाळला. महापालिकेने दरमहा देण्यात येणारी बिलेही कंपनीला दिली नाहीत. कोट्यवधी रुपयांची वाहने कंपनीने खरेदी केली होती. त्याचा खर्च द्यावा, अशी मागणी कंपनीने केली. महापालिकेने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे कंपनीने लवादाकडे धाव घेतली. २०१८ मध्ये लवादाने महापालिकेच्या विरोधात निर्णय दिला. कंपनीला २७ कोटी रुपये द्यावेत, असे लवादाने म्हटले होते. लवादाच्या या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाने लवादाचा निर्णय कायम ठेवल्याची माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली. या निर्णयाला खंडपीठात आव्हान देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मनपाचा ठपका कंपनीवरचरॅमकी कंपनीचे काम समाधानकारक नसल्याचा ठपका तत्कालीन राजकीय मंडळींनी वारंवार सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला होता. राजकीय त्रास आणि आर्थिक कुचंबणा यामुळे कंपनीने नोटीस देऊन काम बंद केले होते.

रेड्डीची वाटचाल रॅमकीकडेसध्या शहरातील संपूर्ण कचरा जमा करण्याचे काम हैदराबाद येथील रेड्डी कंपनीकडे आहे. करारात ठरल्यानुसार ही कंपनी अजिबात काम करीत नाही. डोअर टू डोअर कलेक्शनचे काम शंभर टक्के पूर्ण झाले नाही. घंटागाडी येत नसल्याची बाजारपेठेत आणि विविध वसाहतींमध्ये तक्रार आहे. त्यामुळे रेड्डी कंपनीची वाटचालही रॅमकीच्या दिशेनेच सुरू झाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयGarbage Disposal Issueकचरा प्रश्न