शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

पावसाने शेतातील सारेच वाहून नेले; मदत तर दूरच, बँकेने दिली कर्जवसुलीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:35 IST

अतिवृष्टीने पीक मातीमोल, पण बँकेकडून शेतकऱ्याला थेट कोर्टाची नोटीस

- रघुनाथ साळवेउंडणगाव ( छत्रपती संभाजीनगर) : सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उघडे पडले, जनावरांचा चारा नाहीसा झाला, उभं पीक मातीमोल झालं, घरांची पडझड झाली; पण या संकटानंतरही बँकेच्या कर्ज वसुलीच्या नोटिसा मात्र थांबल्या नाहीत. राष्ट्रीयीकृत बँक ऑफ बडोदा, उंडणगाव शाखेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी कोर्टाच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत.

वर्षानुवर्षे निसर्गाच्या लहरीपणाशी झुंजणारे उंडणगाव येथील शेतकरी कन्हैया दगडू बसैये यांनी बँक ऑफ बडोदाकडून पीककर्ज आणि शेती विकासासाठी ४ लाख २८ हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं; मात्र सततचा दुष्काळ आणि यंदाच्या पावसाच्या प्रलयात उद्ध्वस्त झालेल्या पिकांमुळे त्यांच्या हाती काहीच उरलं नाही. त्यांच्या शेतातील मका पिकांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पीक हातचं गेलं. त्यामुळे कर्जपरतफेड करणे त्यांना कठीण झाले. अशात त्यांना बँक ऑफ बडोदाने तालुका विधी प्राधिकरणामार्फत थकित कर्ज, त्यावरील व्याज व अन्य खर्च अशी रक्कम भरण्याची नोटीस दिली. याबाबत शेतकरी बसैये म्हणतात, सरकारकडून कर्जमाफीच्या आशेवर दिवस काढले; पण ना कर्ज माफ झालं, ना कुणी विचारलं. उलट बँकेच्या वकिलांमार्फत कोर्टाच्या नोटिसा आल्या. अशा स्थितीत या नोटिसा म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटतंय.

बँकेच्या जाचाखाली दबलेला शेतकरीसततची नैसर्गिक आपत्ती, शेतीचा वाढता खर्च आणि हमीभावाचा अभाव या संकटांनी शेतकरीवर्ग आधीच खचलेला आहे. अशात खरीप, रब्बी हंगामासाठी शेतकरी बँकेकडून थोडेफार कर्ज घेतात. शेतीने साथ न दिल्यास बँकेचा हप्ता थकतो, असे असले तरी बँका मात्र कर्जवसुलीच्या नोटिसा देत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मानसिक तणावात प्रचंड वाढ झाली आहे.

नोटिसा वकिलामार्फत जातातआमचं काम थकबाकीदारांची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचं आहे. शासनाकडून वसुली थांबवण्याचा लेखी आदेश आम्हाला मिळालेला नाही. त्यामुळे नोटिसा वकिलामार्फत पाठवल्या जातात.- गजानन बैस, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा, उंडणगाव

आता शासन आदेशाची प्रतीक्षामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दुष्काळी स्थितीच्या सर्व सवलती अतिवृष्टीग्रस्त भागात लागू केल्या जातील, असे सांगितले आहे. दुष्काळी स्थितीत कर्जवसुलीला स्थगिती असते. त्यामुळे राज्य शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती देण्याचा आदेश कधी काढेल? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Floods Wiped Out Farms; Bank Sends Loan Recovery Notices.

Web Summary : Despite flood devastation, farmers in Undangaon receive loan recovery notices from Bank of Baroda. Crop loss prevents repayment, adding to farmer distress. Government aid is awaited.
टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्रbankबँक