शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा दिलासा

By admin | Updated: August 23, 2014 00:45 IST

परभणी: दीड महिन्याच्या खंडानंतर शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत.

परभणी: दीड महिन्याच्या खंडानंतर शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. जिल्हाभरात सरासरी १६ मि.मी. पाऊस झाला असला तरी माना टाकणाऱ्या पिकांसाठी हा पाऊस ‘आॅक्सीजन’ ठरला आहे.यावर्षी पावसाने दगा दिल्याने पिकांची स्थिती अतिशय नाजूक झाली होती. सरासरीच्या १३ टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाळ्याच्या दिवसांतही कडक ऊन, वाढलेला उकाडा आणि पाण्यासाठी भटकंती असे उन्हाळ्यातील चित्र नागरिक अनुभवत आहेत. पिकांच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबिन ही मुख्य पिके असून, दीड महिन्यांपासून पाऊसच नसल्याने पिके माना टाकू लागली होती. चार-आठ दिवस पाऊस झाला नाही तर ही पिके भुईसपाट होण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे टाकले होते. या संकटकाळातच गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे वरुणराजा मदतीला धाऊन आला. २२ आॅगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असला तरी सेलू आणि जिंतूर या तालुक्याची मात्र निराशा केली आहे. परभणी तालुक्यात पहाटे जोरदार पाऊस झाला. सकाळी ८ वाजेपर्यंत रिमझीम पाऊस सुरू होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी प्रथमच येथील नागरिकांनी पावसाळी वातावरण अनुभवले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात १६ मि.मी. पाऊस२२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात १५.८१ मि.मी. पाऊस झाला. सेलू तालुक्यात ०.४० तर जिंतूर तालुक्यात फक्त १ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ५२ मि.मी. पाऊस सोनपेठ तालुक्यात झाला असून, त्या खालोखाल गंगाखेड तालुक्यात ३७.७५, परभणी तालुक्यात १५.३८, पालम १०, पाथरी ९, पूर्णा ८.४० आणि मानवत तालुक्यात ८.३३ मि.मी. पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात १५३.४५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक २११ मि.मी. पाऊस झाला. गतवर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यात ६१० मि.मी. पाऊस झाला होता, हे विशेष.मराठवाड्याची स्थितीआजपर्यंत होणाऱ्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ ३५.२९ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २९.३ टक्के, जालना जिल्ह्यात ३६.१४ टक्के, परभणी जिल्ह्यात ३६.५८ टक्के, हिंगोली जिल्ह्यात ४३.०६ टक्के, नांदेड जिल्ह्यात ३९.७८ टक्के, बीड जिल्ह्यात ३२.५३ टक्के, लातूर जिल्ह्यात ३६.४३ टक्के तर उस्मानाबाद जिल्ह्यात २३.७१ टक्के पाऊस झाला आहे.पिकांना जीवदानशुक्रवारी जिल्ह्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. तब्बल दीड महिन्याच्या खंडानंतर हा पाऊस झाला. अल्प पावसावर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. कापूस, सोयाबिन ही पिके शेतकऱ्यांनी घेतलेली आहेत. पाऊस नसल्याने पिके कोमेजून जात होती. जमिनीतील पाणी पातळी कमी होत असल्याने दोन्ही पिके धोक्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी झालेल्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले आहे.