शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
7
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
8
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
9
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
10
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
11
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
12
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
13
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
14
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
15
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
16
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
17
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
18
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
19
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
20
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्रनाथ टागोर शाळेला अखेर कुलूप लागणार

By admin | Updated: June 13, 2014 01:11 IST

औरंगाबाद : उपसंचालकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवीत व्यंकटेश शिक्षणसंस्थेच्या कार्यकारी मंडळाने रवींद्रनाथ टागोर माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : टप्प्याटप्प्याने वर्ग बंद करण्याचा शिक्षण उपसंचालकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवीत व्यंकटेश शिक्षणसंस्थेच्या कार्यकारी मंडळाने रवींद्रनाथ टागोर माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्यकारी मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पुरेशा वर्ग खोल्या, भौतिक सुविधा व आरटीई-२००९ मुळे शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाने घेतला आहे. या निर्णयास शाळेतील कार्यरत कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. खंडपीठाने दिलेल्या निकालात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवा संरक्षणाबाबत निर्णय दिला असून, माध्यमिक शाळा सुरू ठेवण्याबाबत कुठलाच निर्णय दिला नाही. त्यामुळे कार्यकारी मंडळाने यापूर्वीच शाळा बंद करण्याबाबत व विद्यार्थ्यांच्या समायोजनासाठी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांना कळविले आहे.
चौकशी समितीची शिफारसही लाथाळली
रवींद्रनाथ टागोर माध्यमिक शाळा एकदाच बंद करण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय चुकीचा व विद्यार्थी हिताच्या विरुद्ध आहे. शाळेची विद्यार्थिसंख्या मोठी असून, नजीकच्या शाळांतून या विद्यार्थ्यांचे समायोजन करणे अवघड आहे, अशी शिफारस माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी केली होती. क्रीडांगणाचा मुद्दा उपस्थित करून व्यवस्थापनाने माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन शिक्षकांना तशा नोटिसा बजावल्या होत्या.
सदर संस्थेमार्फत प्राथमिक व माध्यमिक, असे दोन्ही विभाग एकाच इमारतीत चालविले जातात; परंतु जागेचा मुद्दा पुढे करून फक्त माध्यमिक विभाग बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. आठवी ते दहावी या तीन वर्गांसाठी संस्थेला सहा तुकड्या मंजूर असून, सहशिक्षकांचे ९ व शिक्षकेतर ५ पदे मंजूर आहेत. या तीन वर्गांत ३५१ विद्यार्थी शिकत आहेत.
शाळेचा दहावीचा निकालही चांगला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, पालकांचा विरोध व शिक्षकांच्या सेवासमाप्तीबाबतचे न्यायालयात प्रलंबित प्रकरण, विद्यार्थी समायोजनाची अडचण, जवळच्या शाळेत असलेली विद्यार्थ्यांची जास्त संख्या या बाबींचा विचार करता कोणत्याही विद्यार्थ्यास टीसी देऊ नये, असे मत चौकशी समितीने नोंदविले आहे.
व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरुद्ध पालकांमध्ये तीव्र संताप आहे. १५० हून अधिक पालकांनी लेखी तक्रारी देऊन शाळा बंद करण्यास विरोध दर्शविला आहे. मनविसेने याविरुद्ध आंदोलन छेडले होते.