शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता तपासणी कागदावरच

By admin | Updated: September 23, 2014 23:22 IST

परभणी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या बांधकामांची गुणवत्ता तपासणीसाठी येथे स्थापन करण्यात आलेली गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा नावालाच असल्याचे समोर आले आहे़

परभणी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या बांधकामांची गुणवत्ता तपासणीसाठी येथे स्थापन करण्यात आलेली गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा नावालाच असल्याचे समोर आले आहे़ या प्रयोगशाळेतील मशीन शोभेच्या वस्तू बनल्या असून, कोणतीही तपासणी न करताच या संदर्भातील अहवाल देण्यात येत असल्याचे समजते़ सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील विविध विकास कामांची तसेच नगरपालिका, महानगरपालिका, कृषी विद्यापीठअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी शहरातील शनिवार बाजार भागात सा़बां़ विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात क्षेत्रीय प्रयोगशाळा उभारण्यात आपली आहे़ या प्रयोगशाळेत करोडे रुपयांच्या मशिनरी उपलब्ध आहेत़ येथे शासकीय इमारती, जिल्ह्यातील रस्ते, कच्चे व पक्के बांधकाम आदींच्या दर्जाची शास्त्रोक्त तपासणी केली जाते़ त्यामध्ये बांधकामात वापरण्यात येणारे सिमेंट, लोखंड, वीट, डांबर, खडी आदींची तपासणी केली जाते़ होणारे बांधकाम दर्जेदार आहे की नाही याचीही तपासणी या प्रयोगशाळेच्या माध्यमातून करण्यात येते़ ही तपासणी प्रत्येक बांधकामासाठी अनिवार्य आहे़ या बाबतचा तपासणी अहवाल असल्याशिवाय एकाही कंत्राटदाराचे बील अदा केले जात नाही़ परंतु, परभणीतील या प्रयोगशाळेत मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे बसविण्यात आलेल्या मशीनचा तपासणीसाठी वापरच केला जात नसल्याचे दिसून येत आहे़ या बाबत अधिक माहिती घेतली असता येथे तपासणीचा मोबदला म्हणून १ हजार रुपयांचा डी़ ेडी़ आणण्यासाठी सांगितले जाते़ प्रत्यक्षात मात्र ४ हजार रुपये घेतले जातात़ शिवाय येथील कर्मचारीच बँकेमध्ये जावून हे डी़डी़ काढून आणतात़ येथील तपासणी अहवालाच्या कोऱ्या प्रतींवर संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या अगोदरच करून ठेवण्यात आलेल्या असून, अहवालासाठी येणाऱ्यांना तात्काळ या कोऱ्या अहवालांवर माहिती भरून हा अहवाल दिला जातो़ यातून आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार औरंगाबाद येथील गुणवत्ता नियंत्रक व दक्षता विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे करण्यात आली आहे़ या प्रयोगशाळेसाठी दोन अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ परंतु, प्रत्यक्षात मात्र हे अभियंते येथे न राहता त्यांनी एका कर्मचाऱ्यालाच या बाबतचे काम दिले आहे़ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रयोगशाळेत होत असलेल्या कामांची शास्त्रोक्त तपासणी होत नाही़ त्यामुळे गुणवत्तापूर्ण काम होत नाही़ परिणामी निकृष्ट कामामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात जात आहे़ या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व औरंगाबाद येथील गुणवत्ता नियंत्रक व दक्षता विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़ (जिल्हा प्रतिनिधी)