शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते; त्यांच्यामुळेच कुणबी ‘ओबीसी’त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 19:20 IST

विद्यापीठातील व्याख्यानात राजेश मिरगे यांचे प्रतिपादन; शेतकरी, कष्टकरी संपूर्ण कुणबी व अठरापगड समाज ‘ओबीसी’ असला पाहिजे, ही भूमिका डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेकवेळा मांडली.

छत्रपती संभाजीनगर : अठरापगड घटकातील कृषक, कष्टकरी बहुजन समजाला ‘शिक्षण-कृषी व सामाजिक’ क्षेत्रातील समग्र समाजक्रांतीची प्रेरणा देणारे प्रणेते म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य मोलाचे आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक, अभ्यासक डॉ. राजेश मिरगे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. 

शिवाजी शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले कला व सीतारामजी चौधरी वाणिज्य महाविद्यालय यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके होते. ‘क्रांतीदर्शी डॉ. पंजाबराव देशमुख : समग्र समाज क्रांती व संविधानविषयक कार्य’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी प्राचार्य डॉ. दिलीप हांडे, प्रा. मधुकर रोडे, डॉ. राजेश मिरगे, डॉ. सचिन देशमुख, संयोजक डॉ. कैलास अंभुरे, डॉ. छत्रभुज कदम, डॉ. कैलास पाथ्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला.

डॉ. मिरगे म्हणाले, की १९१७ मध्ये खामगावात भरलेल्या शिक्षण परिषदेत राजर्षी शाहू महाराजांशी झालेली भेट आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. एक कर्ते सुधारक म्हणून पंजाबरावांनी धर्माची चिकित्सा व मानवी कल्याणाचा विचार मांडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देखील घटनासमितीत ‘मोरल सपोर्ट’ तर दिलाच, सोबतच सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत सहभाग घेतला. केंद्रीय कृषिमंत्री, शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक, घटना समिती सदस्य अशा अनेक भुमिकांमधून डॉ. पंजाबराव देशमुख यांचे योगदान कायम स्मरणात राहील. डॉ. दिलीप हाडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. छत्रभूज कदम यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले.

पंजाबरावांमुळेचे कुणबी ‘ओबीसी’तशेतकरी, कष्टकरी संपूर्ण कुणबी व अठरापगड समाज ‘ओबीसी’ असला पाहिजे, ही भूमिका डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेकवेळा मांडली. विदर्भातील शेतकरी कुणबी नोंदी करू लागले, मात्र ‘मराठा’ ही प्रदेशात्मक संज्ञा मराठवाड्यातील कुणब्यांनी लावली आणि ते आरक्षणापासून वंचित राहिले. डॉ. पंजाबराव यांचे म्हणने तेव्हाच समजून घेतले असते तर राज्यातील सर्व शेतकरी घटकांना हा लाभ मिळाला असता, असे डॉ. मिरगे म्हणाले.

टॅग्स :parabhaniपरभणीMarathwadaमराठवाडाMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण