शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते; त्यांच्यामुळेच कुणबी ‘ओबीसी’त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 19:20 IST

विद्यापीठातील व्याख्यानात राजेश मिरगे यांचे प्रतिपादन; शेतकरी, कष्टकरी संपूर्ण कुणबी व अठरापगड समाज ‘ओबीसी’ असला पाहिजे, ही भूमिका डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेकवेळा मांडली.

छत्रपती संभाजीनगर : अठरापगड घटकातील कृषक, कष्टकरी बहुजन समजाला ‘शिक्षण-कृषी व सामाजिक’ क्षेत्रातील समग्र समाजक्रांतीची प्रेरणा देणारे प्रणेते म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य मोलाचे आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक, अभ्यासक डॉ. राजेश मिरगे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. 

शिवाजी शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले कला व सीतारामजी चौधरी वाणिज्य महाविद्यालय यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके होते. ‘क्रांतीदर्शी डॉ. पंजाबराव देशमुख : समग्र समाज क्रांती व संविधानविषयक कार्य’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी प्राचार्य डॉ. दिलीप हांडे, प्रा. मधुकर रोडे, डॉ. राजेश मिरगे, डॉ. सचिन देशमुख, संयोजक डॉ. कैलास अंभुरे, डॉ. छत्रभुज कदम, डॉ. कैलास पाथ्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला.

डॉ. मिरगे म्हणाले, की १९१७ मध्ये खामगावात भरलेल्या शिक्षण परिषदेत राजर्षी शाहू महाराजांशी झालेली भेट आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. एक कर्ते सुधारक म्हणून पंजाबरावांनी धर्माची चिकित्सा व मानवी कल्याणाचा विचार मांडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देखील घटनासमितीत ‘मोरल सपोर्ट’ तर दिलाच, सोबतच सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत सहभाग घेतला. केंद्रीय कृषिमंत्री, शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक, घटना समिती सदस्य अशा अनेक भुमिकांमधून डॉ. पंजाबराव देशमुख यांचे योगदान कायम स्मरणात राहील. डॉ. दिलीप हाडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. छत्रभूज कदम यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले.

पंजाबरावांमुळेचे कुणबी ‘ओबीसी’तशेतकरी, कष्टकरी संपूर्ण कुणबी व अठरापगड समाज ‘ओबीसी’ असला पाहिजे, ही भूमिका डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेकवेळा मांडली. विदर्भातील शेतकरी कुणबी नोंदी करू लागले, मात्र ‘मराठा’ ही प्रदेशात्मक संज्ञा मराठवाड्यातील कुणब्यांनी लावली आणि ते आरक्षणापासून वंचित राहिले. डॉ. पंजाबराव यांचे म्हणने तेव्हाच समजून घेतले असते तर राज्यातील सर्व शेतकरी घटकांना हा लाभ मिळाला असता, असे डॉ. मिरगे म्हणाले.

टॅग्स :parabhaniपरभणीMarathwadaमराठवाडाMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण