शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

प्रचार संपला

By admin | Updated: October 14, 2014 00:41 IST

औरंगाबाद : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सोमवारी शहरातील विविध पक्षांच्या उमेदवारांनी काढलेल्या दुचाकी रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभांमुळे संपूर्ण वातावरण निवडणूकमय झाल्याचे दिसले.

औरंगाबाद : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सोमवारी शहरातील विविध पक्षांच्या उमेदवारांनी काढलेल्या दुचाकी रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभांमुळे संपूर्ण वातावरण निवडणूकमय झाल्याचे दिसले. औरंगाबाद पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघांत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करून निवडून देण्याचे आवाहन केले. औरंगाबाद पूर्वमध्ये काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा, शिवसेनेच्या उमेदवार कला ओझा यांच्या रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाला. भाजपाचे अतुल सावे, मनसेचे सुमित खांबेकर, राष्ट्रवादीचे जुबेर मोतीवाला यांनीही पदयात्रा काढल्या. मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद पाटील, काँग्रेसचे एम. एम. शेख, भाजपाचे किशनचंद तनवाणी यांनीही अखेरच्या दिवशी कॉर्नर सभांसह पदयात्रा काढून जोर लावला. औरंगाबाद पश्चिममध्ये काँग्रेसचे जितेंद्र देहाडे, शिवसेनेचे संजय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद दाभाडे, भाजपाचे मधुकर सावंत, पँथर्स रिपाचे गंगाधर गाडे आदींसह विविध उमेदवारांनी पदयात्रा आणि कॉर्नर सभांद्वारे वातावरण ढवळून टाकले. १२ सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. यात सर्वच पक्षांचे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी हजेरी लावली. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले होते. या वर्षीच्या प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर सर्वच पक्ष आणि उमेदवारांनी वापर करून मतदारापर्यंत पोहोचण्याचा ‘हायटेक’ प्रयत्न केला.