शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या डीपीआरनंतर सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:05 IST

औरंगाबाद : वाळूजमार्गे महावीर चौक ते चिकलठाणापर्यंत उड्डाणपूल उभारण्याबाबत डीपीआरचे काम (सविस्तर प्रकल्प अहवाल) पुढील महिन्यात सुरू होणार असून, ...

औरंगाबाद : वाळूजमार्गे महावीर चौक ते चिकलठाणापर्यंत उड्डाणपूल उभारण्याबाबत डीपीआरचे काम (सविस्तर प्रकल्प अहवाल) पुढील महिन्यात सुरू होणार असून, डीपीआरनंतर पुलाच्या कामाचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

डीपीआरचे काम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी (एनएचएआय) राजीव अग्रवाल यांना पत्र देण्यास सांगितले आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी चिकलठाणा ते वाळूजपर्यंत उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावाचा विचार केला आहे. त्यानुसार डीपीआरचे काम हाती घेण्यात येईल.

दोन दिवसांपूर्वी अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी शहरातील रस्ते, एनएचएआयचे प्रकल्प व नवीन प्रस्ताव याबाबत बैठक घेतली होती. त्यानंतर मंगळवारी डॉ. कराड यांनी डीपीआरच्या अनुषंगाने दिल्लीत चर्चा केली.

दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीमध्ये आ. अतुल सावे, एनएचएआय प्रादेशिक अधिकारी अग्रवाल, कार्यकारी व्यवस्थापक नरेश वडेट्टवार, येथील प्रकल्प संचालक अरविंद काळे, माजी महापौर बापू घडामोडे यांच्यासह उद्योजक मुकुंद भोगले, मानसिंग पवार, विवेक देशपांडे उपस्थित होते.

शेंद्रा आणि वाळूज या दोन्ही औद्योगिक वसाहतींत वर्दळ असते त्यामुळे रस्त्याची कनेक्टिव्हिटी वाढविण्याचा विचार पुन्हा पुढे आला आहे. नगरनाका ते दौलताबाद टी पॉइंट आणि पुढे दौलताबाद गाव आणि वेरूळपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्याचेदेखील राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाने मान्य केले आहे.

ए.एस. क्लब ते लासुर, वैजापूर आणि शिर्डी असा नव्याने चार पदरी रस्ता विस्तारित करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी साईबाबा संस्थाननेही मदत करण्याचे कळविले आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर औट्रम घाट यामध्ये बोगदा करण्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

२५ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार बैठक

२५ तारखेला नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय राजमार्गचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील जास्तीत जास्त प्रकल्पांना मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले. औरंगाबादमधील मंजूर आणि प्रस्तावित कामांबाबत तसेच औट्रम घाटातील बोगदा किंवा चौपदरी काम करण्याबाबत विचार होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.