शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

स्वच्छ सर्वेक्षणाची तयारी शून्य, क्रमवारी घसरण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:05 IST

औरंगाबाद : स्वच्छ शहर अभियानात दहा लाख लोकसंख्येपर्यंतच्या शहरांमध्ये गतवर्षी औरंगाबाद शहराचा क्रमांक २६ वा आला होता. यंदा ...

औरंगाबाद : स्वच्छ शहर अभियानात दहा लाख लोकसंख्येपर्यंतच्या शहरांमध्ये गतवर्षी औरंगाबाद शहराचा क्रमांक २६ वा आला होता. यंदा महापालिकेकडून अभियानासाठी कोणतीही तयारी करण्यात आलेली नाही. महापालिकेचा घनकचरा विभाग सध्या निद्रिस्त आहे. त्यामुळे शहराच्या क्रमवारीत मोठी घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र शासनाने मागील काही वर्षांपासून स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे. लहान-मोठी शहरे स्वच्छ व्हावीत यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मागील वर्षी महापालिकेने अभियानासाठी जोरदार तयारी केली होती. राज्यातील कोणत्याही महापालिकेला आजपर्यंत राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी १०० टक्के अनुदान दिलेले नाही. औरंगाबाद महापालिकेला तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाने तब्बल १५८ कोटी रुपये दिले आहेत. या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये महापालिकेला फारसे यश आलेले नाही. विशेष बाब म्हणजे शहर स्वच्छतेसाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून कोणतेही प्रयत्न दिसून येत नाहीत. शहरातील कचरा संकलनाचे काम हैदराबाद येथील रेड्डी कंपनीवर सोपवून महापालिका प्रशासन मोकळे झाले. कंपनीच्या कामावर महापालिकेचे अजिबात लक्ष राहिलेले नाही. त्यामुळे कंपनी आपल्या मर्जीनुसार काम करीत आहे. त्याचा त्रास औरंगाबादकरांना सहन करावा लागत आहे.

दरवर्षी केंद्र शासनाचे विशेष पथक डिसेंबरअखेर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात दाखल होते. या पथकाकडून वेगवेगळ्या निकषावर शहर स्वच्छतेची पाहणी केली जाते. वेगवेगळ्या कामांसाठी महापालिकेला गुण देण्याचे काम पथकाकडून करण्यात येते. मागील वर्षी महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात स्वच्छ सर्वेक्षणासाठी चांगली वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. त्याचा फायदा महापालिका आणि शहराला झाला. देशभरातील दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये औरंगाबादचा क्रमांक २६ वा होता. राष्ट्रीय पातळीवर ८८ वा क्रमांक आला होता. त्यापूर्वी एक वर्ष अगोदर म्हणजेच २०१९ मध्ये दहा लाखांच्या यादीत शहर ४६ व्या क्रमांकावर, तर राष्ट्रीय स्तरावर २२० व्या क्रमांकावर होते. शहराला ‘टॉप टेन’मध्ये आणण्यासाठी महापालिकेने ज्या पद्धतीने काम करायला हवे तसे यंदा होताना दिसून येत नाही.

चौकट...

मागील वर्षीचे गुणांकन

नागरिकांना दर्जेदार सोयीसुविधा दिल्याबद्दल ६४५ गुण, हगणदारीमुक्त शहर केल्याबद्दल ५००, प्रत्यक्ष सहभागाबद्दल १४६५, नागरिकांचा प्रतिसाद १०१८, असे ३ हजार २७९ गुण ६ हजारांपैकी मिळाले होते.

राष्ट्रीय स्तरावरील शहराची क्रमवारी

२०१७ - २९९

२०१८ - १२८

२०१९ - २२०

२०२० - ८८

चौकट...

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

केंद्र शासनाच्या क्रमवारीत चांगली सुधारणा झाल्यास शहराला काही निधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून प्रशासन क्रमवारी सुधारण्याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. ही शहरासाठी दुर्दैवाची बाब आहे.

विजय औताडे, माजी उपमहापौर