शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

स्वच्छ सर्वेक्षणाची तयारी शून्य, क्रमवारी घसरण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:05 IST

औरंगाबाद : स्वच्छ शहर अभियानात दहा लाख लोकसंख्येपर्यंतच्या शहरांमध्ये गतवर्षी औरंगाबाद शहराचा क्रमांक २६ वा आला होता. यंदा ...

औरंगाबाद : स्वच्छ शहर अभियानात दहा लाख लोकसंख्येपर्यंतच्या शहरांमध्ये गतवर्षी औरंगाबाद शहराचा क्रमांक २६ वा आला होता. यंदा महापालिकेकडून अभियानासाठी कोणतीही तयारी करण्यात आलेली नाही. महापालिकेचा घनकचरा विभाग सध्या निद्रिस्त आहे. त्यामुळे शहराच्या क्रमवारीत मोठी घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र शासनाने मागील काही वर्षांपासून स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे. लहान-मोठी शहरे स्वच्छ व्हावीत यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मागील वर्षी महापालिकेने अभियानासाठी जोरदार तयारी केली होती. राज्यातील कोणत्याही महापालिकेला आजपर्यंत राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी १०० टक्के अनुदान दिलेले नाही. औरंगाबाद महापालिकेला तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाने तब्बल १५८ कोटी रुपये दिले आहेत. या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये महापालिकेला फारसे यश आलेले नाही. विशेष बाब म्हणजे शहर स्वच्छतेसाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून कोणतेही प्रयत्न दिसून येत नाहीत. शहरातील कचरा संकलनाचे काम हैदराबाद येथील रेड्डी कंपनीवर सोपवून महापालिका प्रशासन मोकळे झाले. कंपनीच्या कामावर महापालिकेचे अजिबात लक्ष राहिलेले नाही. त्यामुळे कंपनी आपल्या मर्जीनुसार काम करीत आहे. त्याचा त्रास औरंगाबादकरांना सहन करावा लागत आहे.

दरवर्षी केंद्र शासनाचे विशेष पथक डिसेंबरअखेर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात दाखल होते. या पथकाकडून वेगवेगळ्या निकषावर शहर स्वच्छतेची पाहणी केली जाते. वेगवेगळ्या कामांसाठी महापालिकेला गुण देण्याचे काम पथकाकडून करण्यात येते. मागील वर्षी महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात स्वच्छ सर्वेक्षणासाठी चांगली वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. त्याचा फायदा महापालिका आणि शहराला झाला. देशभरातील दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये औरंगाबादचा क्रमांक २६ वा होता. राष्ट्रीय पातळीवर ८८ वा क्रमांक आला होता. त्यापूर्वी एक वर्ष अगोदर म्हणजेच २०१९ मध्ये दहा लाखांच्या यादीत शहर ४६ व्या क्रमांकावर, तर राष्ट्रीय स्तरावर २२० व्या क्रमांकावर होते. शहराला ‘टॉप टेन’मध्ये आणण्यासाठी महापालिकेने ज्या पद्धतीने काम करायला हवे तसे यंदा होताना दिसून येत नाही.

चौकट...

मागील वर्षीचे गुणांकन

नागरिकांना दर्जेदार सोयीसुविधा दिल्याबद्दल ६४५ गुण, हगणदारीमुक्त शहर केल्याबद्दल ५००, प्रत्यक्ष सहभागाबद्दल १४६५, नागरिकांचा प्रतिसाद १०१८, असे ३ हजार २७९ गुण ६ हजारांपैकी मिळाले होते.

राष्ट्रीय स्तरावरील शहराची क्रमवारी

२०१७ - २९९

२०१८ - १२८

२०१९ - २२०

२०२० - ८८

चौकट...

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

केंद्र शासनाच्या क्रमवारीत चांगली सुधारणा झाल्यास शहराला काही निधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून प्रशासन क्रमवारी सुधारण्याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. ही शहरासाठी दुर्दैवाची बाब आहे.

विजय औताडे, माजी उपमहापौर