शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सुपीक जमिनीवर अतिवृष्टीचा घाला; मराठवाड्यात ७ हजार हेक्टर जमीन गेली वाहून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 13:12 IST

३ इंचांपेक्षा अधिक जमीन वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांसह मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देचार वर्षांपासून होत आहे अनोनात नुकसान यंदाही मोठ्या प्रमाणात जमीन गेली वाहून

औरंगाबाद : मराठवाड्यात मागील तीन वर्षांपासून सुपीक जमीन अतिवृष्टीमुळे वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा १५० टक्के पाऊस झाल्याने अंदाजे ७ हजार हेक्टर जमीन वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तीन वर्षांत सुमारे १० हजार हेक्टर जमीन अतिपावसामुळे खरडून गेली. २०२० साली झालेल्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत सुमारे ६ हजार ८२१ हेक्टर जमीन वाहून गेली. यामध्ये सर्वाधिक जमीन उस्मानाबाद, जालना जिल्ह्यातील होती. औरंगाबाद जिल्ह्यातील ५०, जालन्यातील २५०० हेक्टर, नांदेडमधील ६६, लातूरमधील १ हजार तर उस्मानाबादमधील ३ हजार १६५ हेक्टर जमीन वाहून गेली. यंदाही अशीच अवस्था झाली असून, पंचनाम्याअंती किती जमीन वाहून गेली, हे स्पष्ट होईल.

मराठवाड्यात न भूतो न भविष्यती पाऊस; ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

२०१९ च्या पावसाळ्यात विभागातील सुमारे ३ हजार हेक्टर जमीन वाहून गेली होती. ३ इंचांपेक्षा अधिक जमीन वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांसह मोठे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत शासनाकडे प्रस्तावही देण्यात आले होते. ३७ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर नुकसानभरपाईचे प्रस्ताव दिले. मात्र, त्यातून शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या जमिनी पूर्ववत झाल्या नाहीत. २०१८ सालीदेखील मराठवाड्यातील नांदेड, औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील जमीन वाहून गेली. १ हजार हेक्टरच्या आसपास जमीन वाहून गेल्याचे पंचनामे प्रशासनाने केले होते. जमीन खरडण्याचे प्रमाण वाढले आहे. नदीपात्र बदलल्यामुळेही शेतजमीन वाहून गेली. तीन वर्षांत सुमारे २ हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले.

मराठवाड्यावर आभाळ फाटले; १० जणांचा बळी, २५ लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल

का वाहून जाते जमीन ?मराठवाड्यात जमीन वाहून जाण्याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण वृक्षतोड आहे. जमिनीचे उतार, सपाटीकरण नसल्यामुळेदेखील नुकसान होत आहे. सुपीक जमीन अतिपावसामुळे लवकर वाहून जाते. त्यासाठी पाण्याचा वेग थोपविणारी वृक्षलागवड महत्त्वाची आहे. मागील तीन वर्षांपासून अतिपावसामुळे जमिनीचे नुकसान होत आहे, असे जल व भूमी व्यवस्थापन (वाल्मी) येथील मृदा शास्त्रज्ञांनी सांगितले.

जायकवाडी धरणाच्या ४६ वर्षाच्या इतिहासात विसर्गाचे यंदाचे २२ वे वर्ष

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेती