शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सुपीक जमिनीवर अतिवृष्टीचा घाला; मराठवाड्यात ७ हजार हेक्टर जमीन गेली वाहून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 13:12 IST

३ इंचांपेक्षा अधिक जमीन वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांसह मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देचार वर्षांपासून होत आहे अनोनात नुकसान यंदाही मोठ्या प्रमाणात जमीन गेली वाहून

औरंगाबाद : मराठवाड्यात मागील तीन वर्षांपासून सुपीक जमीन अतिवृष्टीमुळे वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा १५० टक्के पाऊस झाल्याने अंदाजे ७ हजार हेक्टर जमीन वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तीन वर्षांत सुमारे १० हजार हेक्टर जमीन अतिपावसामुळे खरडून गेली. २०२० साली झालेल्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत सुमारे ६ हजार ८२१ हेक्टर जमीन वाहून गेली. यामध्ये सर्वाधिक जमीन उस्मानाबाद, जालना जिल्ह्यातील होती. औरंगाबाद जिल्ह्यातील ५०, जालन्यातील २५०० हेक्टर, नांदेडमधील ६६, लातूरमधील १ हजार तर उस्मानाबादमधील ३ हजार १६५ हेक्टर जमीन वाहून गेली. यंदाही अशीच अवस्था झाली असून, पंचनाम्याअंती किती जमीन वाहून गेली, हे स्पष्ट होईल.

मराठवाड्यात न भूतो न भविष्यती पाऊस; ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

२०१९ च्या पावसाळ्यात विभागातील सुमारे ३ हजार हेक्टर जमीन वाहून गेली होती. ३ इंचांपेक्षा अधिक जमीन वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांसह मोठे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत शासनाकडे प्रस्तावही देण्यात आले होते. ३७ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर नुकसानभरपाईचे प्रस्ताव दिले. मात्र, त्यातून शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या जमिनी पूर्ववत झाल्या नाहीत. २०१८ सालीदेखील मराठवाड्यातील नांदेड, औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील जमीन वाहून गेली. १ हजार हेक्टरच्या आसपास जमीन वाहून गेल्याचे पंचनामे प्रशासनाने केले होते. जमीन खरडण्याचे प्रमाण वाढले आहे. नदीपात्र बदलल्यामुळेही शेतजमीन वाहून गेली. तीन वर्षांत सुमारे २ हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले.

मराठवाड्यावर आभाळ फाटले; १० जणांचा बळी, २५ लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल

का वाहून जाते जमीन ?मराठवाड्यात जमीन वाहून जाण्याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण वृक्षतोड आहे. जमिनीचे उतार, सपाटीकरण नसल्यामुळेदेखील नुकसान होत आहे. सुपीक जमीन अतिपावसामुळे लवकर वाहून जाते. त्यासाठी पाण्याचा वेग थोपविणारी वृक्षलागवड महत्त्वाची आहे. मागील तीन वर्षांपासून अतिपावसामुळे जमिनीचे नुकसान होत आहे, असे जल व भूमी व्यवस्थापन (वाल्मी) येथील मृदा शास्त्रज्ञांनी सांगितले.

जायकवाडी धरणाच्या ४६ वर्षाच्या इतिहासात विसर्गाचे यंदाचे २२ वे वर्ष

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेती