शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या राजकीय उलथा-पालथींची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 11:51 IST

‘युती होते की तुटते’ यावर पक्ष बदलण्याचा निर्णय

ठळक मुद्देसत्तार यांच्या सेनाप्रवेशानंतर वातावरण गरम 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघण्याच्या वाटेवर आहे. येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या उलथा-पालथीची शक्यता आहे. युती आणि आघाडीच्या गोळाबेरजेवरच सगळी राजकीय गणितं अवलंबून असून, येणाऱ्या काही दिवसांमध्ये निश्चितच मोठे राजकीय आदान-प्रदान होणे शक्य आहे. काँग्रेसचे माजी आ. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय चर्चांचा बाजार गरम झाला आहे. कन्नड, फुलंब्री, गंगापूरमधून मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

फुलंब्रीचे काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सोशल मीडियातून होत आहे. कन्नडचे माजी आ. हर्षवर्धन जाधव यांच्यासह आणखी एक काँग्रेसचे माजी आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तसेच कन्नडमधील एक-दोन नगरपालिका सदस्यांनीदेखील शिवसेनेशी संपर्क सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून भाजपचे किशनचंद तनवाणी यांचा शिवसेना प्रवेश सोशल मीडियाने घडवून आणला होता; परंतु प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही. तनवाणी हे भाजपमध्ये राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या प्रवेशाच्या बातम्यांना ब्रेक लागला आहे. 

कल्याण काळे यांचे स्पष्टीकरण असेकृष्णा पा. डोणगावकरांनी महिनाभरापूर्वी मला विचारणा केली होती. काय चालले आहे, त्यांनी विचारले, मी त्यांना आमची तयारी सुरू असल्याचे सांगितले होते. उलट युती झाल्यावर डोणगावकर तुमचे काय होणार, असेही मी त्यांना त्यावेळी विचारले होते. कालपर्यंत भाजपच्या नावाने बुक केले होते, आता शिवसेनेच्या नावाने बुक केले जात आहे; परंतु मी आहे तेथेच आहे. शिवसेना-भाजप एकत्र लढल्यावर आमचा मतदारसंघ भाजपला जाणार आहे. मी भाजपत जाणार असे एखादा म्हटला असता तर मी समजू शकलो असतो. लोकसभेच्या वेळीही मी काँग्रेस सोडणार अशी राजकीय पुडी अंदाज बांधणाऱ्यांनी सोडली होती. या चर्चांना काहीही अर्थ नाही. 

हर्षवर्धन जाधव म्हणाले, मला ऑफरच नाहीकन्नडचे माजी आ. हर्षवर्धन जाधव म्हणाले, मला तर अजून कुठल्याही पक्षाची आॅफर नाही. कन्नड भाजपला सुटेल अशी चर्चा आहे. काहीपण होऊ शकते, कारण अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले. त्यामुळे सिल्लोड सेनेला आणि कन्नड भाजपला, अशी पण चर्चा आहे. बघू या काय होते ते, सध्या तरी शिवस्वराज्य बहुजन पक्षात आहे.  कुणाची ऑफर आली तर विचार करू. महाराष्ट्र सगळा एका बाजूने कलला आहे. भविष्यात मतदारसंघात विकासकामे करायची झाल्यास सरकार पाठीशी लागेल. त्यामुळे मतदारसंघाच्या दृष्टीने हिताचे निर्णय घ्यायचे झाल्यास घेऊ. मात्र, सध्या कुणाचीही आॅफर नाही आणि मी देखील कुणाशी संपर्क केलेला नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस