शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेवर राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी: विनोद पाटील

By बापू सोळुंके | Updated: May 4, 2024 17:43 IST

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीचे एसईबीसी आरक्षण रद्द करताना ५० टक्केची मर्यादा ओलांडल्या गेल्याचा मुद्दा अधोेरेखीत केले होते.

छत्रपती संभाजीनगर: एसईबीसी आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्केची मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा अधोरेखीत केला होते. आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास  ५० टक्केची मर्यादा तोडून टाकू असे विधान  केले. आता महाराष्ट्रात लढणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ५० टक्केच्या मर्यादेसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी शनिवारी येथे केली.

राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के एसईबीसी आरक्षण लागू केले आहे. यामुळे आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा ओलांडली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीचे एसईबीसी आरक्षण रद्द करताना ५० टक्केची मर्यादा ओलांडल्या गेल्याचा मुद्दा अधोेरेखीत केले होते. यामुळे नवीन मराठा आरक्षण  न्यायालयात टिकेल अथवा नाही, याविषयी समाजबांधवाना सांशकता आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ते सत्तेत आल्यास ५०टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करू असे वक्तव्य केले आहे. हा धागा पकडत विनोद पाटील  यांनी नमूद केले की, राहुल गांधी यांच्या विधानाचे आपण स्वागत करतो. मात्र त्यांचे हे विधान चुनावी जुमला असू नये, असे वाटते. यासोबतच महाराष्ट्रात निवडणूक लढविणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणासंदर्भात ५० टक्केची मर्यादा या मुद्द्यावर भूमिका जाहिर करावी,अशी मागणीही पाटील यांनी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Aurangabadऔरंगाबाद