शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेवर राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी: विनोद पाटील

By बापू सोळुंके | Updated: May 4, 2024 17:43 IST

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीचे एसईबीसी आरक्षण रद्द करताना ५० टक्केची मर्यादा ओलांडल्या गेल्याचा मुद्दा अधोेरेखीत केले होते.

छत्रपती संभाजीनगर: एसईबीसी आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्केची मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा अधोरेखीत केला होते. आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास  ५० टक्केची मर्यादा तोडून टाकू असे विधान  केले. आता महाराष्ट्रात लढणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ५० टक्केच्या मर्यादेसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी शनिवारी येथे केली.

राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के एसईबीसी आरक्षण लागू केले आहे. यामुळे आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा ओलांडली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीचे एसईबीसी आरक्षण रद्द करताना ५० टक्केची मर्यादा ओलांडल्या गेल्याचा मुद्दा अधोेरेखीत केले होते. यामुळे नवीन मराठा आरक्षण  न्यायालयात टिकेल अथवा नाही, याविषयी समाजबांधवाना सांशकता आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ते सत्तेत आल्यास ५०टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करू असे वक्तव्य केले आहे. हा धागा पकडत विनोद पाटील  यांनी नमूद केले की, राहुल गांधी यांच्या विधानाचे आपण स्वागत करतो. मात्र त्यांचे हे विधान चुनावी जुमला असू नये, असे वाटते. यासोबतच महाराष्ट्रात निवडणूक लढविणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणासंदर्भात ५० टक्केची मर्यादा या मुद्द्यावर भूमिका जाहिर करावी,अशी मागणीही पाटील यांनी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Aurangabadऔरंगाबाद