शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तबलिगी जमातचा 'इज्तेमा' सोहळा होणार होता औरंगाबादेत; पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अनर्थ टळला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 10:37 AM

या कार्यक्रमाला अंदाजे 50 हजार लोकांची उपस्थिती असणार होती, असा दावा तब्लीग इज्तेमा कमिटीने केला आहे.

औरंगाबाद- देशात वादग्रस्त ठरलेला दिल्लीतील ‘तबलिगी जमात’चा (इज्तेमा) मेळावा सारखाच कार्यक्रम औरंगाबादमध्ये 27-28 आणि 29 मार्च रोजी होणारा होता. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यक्रमाची परवानगी वेळीच रद्द करण्याची हुशारी दाखविल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रात होणारा प्रादुर्भाव रोखला गेला आहे. त्यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.

तब्लीग इज्तेमा कमिटीने पत्रान्वये औरंगाबाद-पैठण रोडवरील गेवराई येथे पडीत पडलेल्या मैदानात मेळाव्याची परवानगी मागितली होती. परंतु कोरोनाचा राज्यातील अनेक भागात वाढता प्रसार पाहता या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देता येणार नसल्याचे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक आंधळे यांनी आयोजकांना कळविले.

या कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी करताना कार्यक्रमाची सर्व तयारी झाल्याने आपणास परवानगी मिळावी, अशी आयोजकांची विनंती पोलिसांनी लोकांच्या आरोग्याच्या पातळीवर फेटाळून लावली. कारण या कार्यक्रमाला अंदाजे 50 हजार लोकांची उपस्थिती असणार होती, असा दावा तब्लीग इज्तेमा कमिटीने केला आहे.

दिल्ली येथील कार्यक्रमाने संपूर्ण देशाला घाबरवून सोडले आहे. या कार्यक्रमामध्ये परदेशातील 18 मौलवींचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आल्यामुळे शेकडो लोकांना या कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी वेळीच निर्णय घेत या कार्यक्रमाची परवानगी रद्द केल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.

या कार्यक्रमाला जवळपास 50 हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित होती. त्यासाठी मंडप आणि इतर तयारी सुद्धा करण्यात येत होती. कार्यक्रमात बयाण करण्यासाठी मालेगाव किंवा इतर जिल्ह्यातून कुणाला बोलवायचं याचा निर्णय झाला नव्हता. ते कमिटीच्या बैठकीत ठरणार होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ( हुसेन मौलाना ,व्यवस्थापक तब्लीग इज्तेमा कमिटी )