शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

'वाळूजचा विषारी प्रवाह' टेंभापुरीपर्यंत! परिसरातील २१ गावांचे पाणी दूषित, सिंचनासही धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:30 IST

परदेशवाडी प्रकल्पातील पाण्यात घातक रसायनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले आहे. हे पाणी पिण्यास योग्य नाहीच, पण सिंचनासाठीही अयोग्य ठरवण्यात आले आहे.

- राहुल मुळेवाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील परदेशवाडी तलावाचे पाणी अत्यंत प्रदूषित असल्याचे शासकीय तपासणीत उघड झाल्यानंतर, या दूषित पाण्यामुळे टेंभापुरी तलावाच्या सुरक्षिततेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परदेशवाडी प्रकल्पातील पाण्यात घातक रसायनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले आहे. हे पाणी पिण्यास योग्य नाहीच, पण सिंचनासाठीही अयोग्य ठरवण्यात आले आहे. हे दूषित पाणी झऱ्यांद्वारे, भूगर्भातून, तसेच पाटातून वाहत टेंभापुरी तलावात जाते.

टेंभापुरी तलाव हा परिसरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. या तलावावर अनेक शेतकरी सिंचनासाठीही अवलंबून आहेत. परदेशवाडी प्रकल्पात आणि परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत पाण्यामध्ये त्वचा विकार, हृदयविकार, किडनी विकार, कॅन्सर, थायरॉईड, डोळ्यांचे आजार, ब्ल्यू बेबी सिंड्रोम आणि फ्लोरोसिस यांसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरणारे घटक आढळले आहेत.

"आमचा जगण्याचा हक्क हिरावला जातो आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे," असे जोगेश्वरी, रामराई, वाळूज, टेंभापुरी, रांजणगाव, आदी परिसरातील ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

प्रशासनाकडून दुर्लक्षप्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य विभाग, एमआयडीसी आणि कृषी विभाग यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. याच धोरणाचा फटका आता टेंभापुरी तलावालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तातडीच्या उपाययोजना१. टेंभापुरी तलावाचे पाणी तत्काळ तपासण्यात यावे. तलावाच्या आजूबाजूच्या झऱ्यांची व भूगर्भ जलवाहिन्यांची दिशा व गुणवत्ता पाहून प्रदूषणाची कारणे रोखावीत.२. परदेशवाडी प्रकल्पात जलशुद्धीकरण यंत्रणा त्वरित उभारावी. एमआयडीसी परिसरातील रासायनिक सांडपाणी पूर्णपणे नियंत्रित करावे.

त्वरित उपाययोजना करा, अन्यथा..."परदेशवाडी व टेंभापुरी मध्यम प्रकल्प दूषित पाण्याच्या संदर्भात योग्य ती दखल घेऊन दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा शेतकरी कृती समितीच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारू."-धनंजय ढोले, सरपंच, टेंभापुरी

पाणीपुरवठ्यावर ताण"टेंभापुरी मध्यम प्रकल्पावर २१ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या प्रश्नावर पारदर्शक आणि काटेकोर कारवाई करण्याची मागणी समितीकडून व्यक्त केली जात आहे."-राहुल पाटील ढोले, शेतकरी कृती समिती, गंगापूर

स्वागतार्ह तपासणी, पण..."टेंभापुरी जलप्रकल्प व परदेशवाडी तलावातील पाण्याची स्थिती गंभीर आहे. जिल्हा आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने घेतले हे स्वागतार्ह आहे, मात्र केवळ तपासणी पुरेशी नाही. दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे."- विठ्ठल पाटील कुंजर, शेतकरी, शिवराई

प्रदूषण मंडळाचे पत्रपाणी प्रदूषणावर म.प्र.नि. मंडळ कार्यालयाकडून या ठिकाणचे पाण्याचे नमुने संकलित केले असून, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आलेला आहे," असे पत्र प्रदूषण मंडळाकडून देण्यात आले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaluj MIDCवाळूज एमआयडीसीpollutionप्रदूषण