शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

सुखद ! पंधरा दिवसात जायकवाडी धरणात २ टीएमसी पाण्याची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 7:08 PM

१ ते १६ या दरम्यान २ टीएमसी म्हणजे ५६ दलघमी पाण्याची वाढ केवळ स्थानिक पावसामुळे झाली 

ठळक मुद्देजायकवाडी जलाशयावर १६ जूनपर्यंत १५० मिमी  पाऊसयाशिवाय नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून सोडलेले पाणी धरणात येणार

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात गेल्या पंधरा दिवसात २ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. १ जून ते १६ जून दरम्यान नाथसागरावर १५० मि.मी पावसाची नोंद झाली असून यामुळे धरणातील जलसाठ्यात ५६ दलघमीने वाढ झाली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात  गुरूवारी दाखल होण्याची शक्यता जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे. जायकवाडी धरणात आवक सुरू झाल्याने  आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जायकवाडी जलाशयावर १६ जून पर्यंत १५० मिमी  पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. धरण परिसरात एक जून रोजीच ४२ मिमी अशा दणकेबाज पावसाने प्रारंभ झाला होता. १ ते १६ या दरम्यान २ टीएमसी म्हणजे ५६ दलघमी पाण्याची वाढ केवळ स्थानिक पावसामुळे झाली असल्याचे दगडी धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर वेअर मधून  ३ जून पासून गोदावरीत कमी जास्त प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नाशिक ते पैठण दरम्यान गोदावरी पात्रात  १२ उच्च पातळी बंधारे असून यात तांदळज , मजूर , दत्त सागर , हिंगणा , डाऊख , सडे शिंगवी , पुणतांबा , नेऊर , वांजरगांव , खानापूर , कमळापूर व नागमठान या बंधाऱ्याचा समावेश आहे.

या बंधाऱ्याची घटलेली पाणीपातळी भरून काढत नाशिकच्या पाण्याने बुधवारी वैजापूर तालुक्यातील नागमठान बंधारा ओलांडला असून गुरूवारी हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी नांदूरमधमेश्वर वेअर मधून होणारा विसर्ग बंद करण्यात आला असला तरी नाशिक ते जायकवाडी दरम्यान गोदावरी नदीचे पात्र प्रवाही झाल्याने यापुढील काळात नाशिकचे पाणी विना अडथळा जायकवाडी धरणात जमा होईल असेही धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले. 

सध्या धरणात ३७% जलसाठा धरणात एकूण जलसाठा ५४ टीएमसी असूनया पैकी उपयुक्त जलसाठा २८ टीएमसी आहे. जायकवाडी धरणात ३३% पेक्षा जास्त जलसाठा असल्यास सिंचनासाठी व पिण्यासाठी पूर्ण आवर्तने देता येतात. धरणातील जलसाठा आजच ३७% असल्याने यंदा धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी देताना कुठलीच अडचण भासणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस