शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बन्सी के बजैया बन्सी रे बजाओ

By admin | Updated: November 30, 2014 00:59 IST

अरुण घोडे, औरंगाबाद स्वरझंकार उत्सवाची सुरुवात मेवाती घराण्याचे ख्यातनाम गायक संजीव अभ्यंकरांच्या चंद्रकौंस रागातल्या ‘पिया बिन परत नाही इक पलहु चैन’ने झाली.

अरुण घोडे, औरंगाबादप्रोझोन प्रासादात व्हायोलिन अकादमीच्या भगीरथ प्रयत्नांनी येथील उद्यम व्यापार क्षेत्रातील रसिकाश्रय दात्यांच्या मदतीने पाचव्या वर्षात पदार्पण केलेल्या स्वरझंकार उत्सवाची सुरुवात मेवाती घराण्याचे ख्यातनाम गायक संजीव अभ्यंकरांच्या चंद्रकौंस रागातल्या ‘पिया बिन परत नाही इक पलहु चैन’ने झाली. बागेश्री अंगाच्या चंद्रकौंसच्या स्वरांनी समस्त रसिक प्रासाद भारून गेला. काळजाचा ठाव घेणाऱ्या मोहक आवाजाची देन लाभलेल्या संजीव अभ्यंकरांनी ‘ले जारे जा कगरवा, पिया को संदेसवा, तरपत हूं मैं जागी सारी रतियां अजहूँ ना आये मोरे पिया’ या चीजेतील भाव रसिकांपर्यंत गाण्यातून अशा सुबोध शैलीत सादर केला की, जणू आईने लेकराला घास घास भरवावे. चंद्रकौंस रागातील बडा ख्याल व द्रुत गायिल्यानंतर त्यांनी रसिकांशी संवाद साधला. शास्त्रीय संगीत रीतसर न शिकलेल्या लोकांनाही अभिजात संगीताची आवड निर्माण होईल एवढा समर्पक हृद्य संवाद त्यांनी साधला. पूर्वार्धानंतर वेणूवादन कार्यक्रमाची नांदी देणारी चीज ‘बन्सी रे बजाओ वही राग, वही तान, वही सूर, वही गान सुनाओ, नट नागर नाचत ताथैया’ या कलावती रागातील भावावस्थेपर्यंत आधीच जाण्याचा योग रसिकांना आला. दोन अभंगांनी त्यांनी गायनाचा समारोप केला. संजीव अभ्यंकरांना संवादिनीवर साथ तन्मय देवचके, तर तालाची रंगत रोहित मुजुमदार यांनी सांभाळली. दुसऱ्या दिवसाच्या स्वरझंकारचा उत्तरार्ध वेणूबासरीचे जणू पर्यायवाची नामाभिधान लाभलेल्या पद्मविभूषण हरिप्रसाद चौरसिया यांच्या वेणूवादनाने सुरू झाला. सुगंधी धूपदीप जळताना अगरबत्तीचा धूर मंद मंद हळुवार वळणे घेत वातावरणात विरघळून एकरूप होतो. तो सुगंधी धूर कलात्मक वळणे घेत आपल्या चित्तवृत्तींना अल्हादित करतो. तसे शब्द, अर्थाचा कसलाच झमेला नसलेले हे वेणूवादन म्हणजे विशुद्ध स्वरानंद. वेणूच्या या जादुई स्वरांना आपल्या तालावर खेळविताना पद्मश्री विजय घाटे यांच्या तबल्याने रंगतदार साथ दिली. आधी राग बिहाग नंतर जैजैवंती आणि दक्षिण भारतीय राग हंसध्वनी सादर केल्यानंतर पंडितजी आणि संगतकार विजय घाटे यांची तालस्वर जुगलबंदी रसिकांची दाद मिळवून गेली. वेणूवादनाला तानपुरीची संगत सुष्मिता डव्हाळकर, तर बांसरीची संगत सोनार यांनी केली. पंडितजींचा सत्कार अनिल इरावने, रणजीतदास, एन.पी. शर्मा यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव शेलार यांंनी केले.