शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

बन्सी के बजैया बन्सी रे बजाओ

By admin | Updated: November 30, 2014 00:59 IST

अरुण घोडे, औरंगाबाद स्वरझंकार उत्सवाची सुरुवात मेवाती घराण्याचे ख्यातनाम गायक संजीव अभ्यंकरांच्या चंद्रकौंस रागातल्या ‘पिया बिन परत नाही इक पलहु चैन’ने झाली.

अरुण घोडे, औरंगाबादप्रोझोन प्रासादात व्हायोलिन अकादमीच्या भगीरथ प्रयत्नांनी येथील उद्यम व्यापार क्षेत्रातील रसिकाश्रय दात्यांच्या मदतीने पाचव्या वर्षात पदार्पण केलेल्या स्वरझंकार उत्सवाची सुरुवात मेवाती घराण्याचे ख्यातनाम गायक संजीव अभ्यंकरांच्या चंद्रकौंस रागातल्या ‘पिया बिन परत नाही इक पलहु चैन’ने झाली. बागेश्री अंगाच्या चंद्रकौंसच्या स्वरांनी समस्त रसिक प्रासाद भारून गेला. काळजाचा ठाव घेणाऱ्या मोहक आवाजाची देन लाभलेल्या संजीव अभ्यंकरांनी ‘ले जारे जा कगरवा, पिया को संदेसवा, तरपत हूं मैं जागी सारी रतियां अजहूँ ना आये मोरे पिया’ या चीजेतील भाव रसिकांपर्यंत गाण्यातून अशा सुबोध शैलीत सादर केला की, जणू आईने लेकराला घास घास भरवावे. चंद्रकौंस रागातील बडा ख्याल व द्रुत गायिल्यानंतर त्यांनी रसिकांशी संवाद साधला. शास्त्रीय संगीत रीतसर न शिकलेल्या लोकांनाही अभिजात संगीताची आवड निर्माण होईल एवढा समर्पक हृद्य संवाद त्यांनी साधला. पूर्वार्धानंतर वेणूवादन कार्यक्रमाची नांदी देणारी चीज ‘बन्सी रे बजाओ वही राग, वही तान, वही सूर, वही गान सुनाओ, नट नागर नाचत ताथैया’ या कलावती रागातील भावावस्थेपर्यंत आधीच जाण्याचा योग रसिकांना आला. दोन अभंगांनी त्यांनी गायनाचा समारोप केला. संजीव अभ्यंकरांना संवादिनीवर साथ तन्मय देवचके, तर तालाची रंगत रोहित मुजुमदार यांनी सांभाळली. दुसऱ्या दिवसाच्या स्वरझंकारचा उत्तरार्ध वेणूबासरीचे जणू पर्यायवाची नामाभिधान लाभलेल्या पद्मविभूषण हरिप्रसाद चौरसिया यांच्या वेणूवादनाने सुरू झाला. सुगंधी धूपदीप जळताना अगरबत्तीचा धूर मंद मंद हळुवार वळणे घेत वातावरणात विरघळून एकरूप होतो. तो सुगंधी धूर कलात्मक वळणे घेत आपल्या चित्तवृत्तींना अल्हादित करतो. तसे शब्द, अर्थाचा कसलाच झमेला नसलेले हे वेणूवादन म्हणजे विशुद्ध स्वरानंद. वेणूच्या या जादुई स्वरांना आपल्या तालावर खेळविताना पद्मश्री विजय घाटे यांच्या तबल्याने रंगतदार साथ दिली. आधी राग बिहाग नंतर जैजैवंती आणि दक्षिण भारतीय राग हंसध्वनी सादर केल्यानंतर पंडितजी आणि संगतकार विजय घाटे यांची तालस्वर जुगलबंदी रसिकांची दाद मिळवून गेली. वेणूवादनाला तानपुरीची संगत सुष्मिता डव्हाळकर, तर बांसरीची संगत सोनार यांनी केली. पंडितजींचा सत्कार अनिल इरावने, रणजीतदास, एन.पी. शर्मा यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव शेलार यांंनी केले.