शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांना मदत मिळण्यासाठी याचिका दाखल

By admin | Updated: July 4, 2014 00:13 IST

परळी: तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासन नियमाप्रमाणे मदत मिळाली नसल्यामुळे कन्हेरवाडी येथील राजाभाऊ फड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे.

परळी: तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासन नियमाप्रमाणे मदत मिळाली नसल्यामुळे कन्हेरवाडी येथील राजाभाऊ फड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.या संदर्भात बोलताना राजाभाऊ फड म्हणाले, परळी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागात झालेल्या नुकसानीचे फेरपंचनामे शासनाने करावेत, या उद्देशाने याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच शासन नियमाप्रमाणे गारपीटग्रस्तांना हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणीही या याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात महसूल अधिकारी व राज्य शासन यांना पार्टी करण्यात आले आहे. दरम्यान, तीन महिन्यापूर्वी परळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपिटीचा पाऊस पडला होता. यामुळे तालुक्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणची पिके उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर शासनाने पंचनामे केले होते. परळी तालुक्यातील नागापूर येथील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये नाहीत, ही बाब समोर आली. त्यामुळे फेर पंचनामे करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील सोळंके यांनी केला आहे. (वार्ताहर)