शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त दिवाळीलाच मिळते साखर

By admin | Updated: August 21, 2014 01:23 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड स्वस्त धान्य दुकानांवर साखरेचे वाटप होत नसल्याचे जिल्ह्यात समोर आले आहे. दिवाळी ते दिवाळीच स्वस्त धान्य दुकानांवर साखर येत असल्याचे ग्रामीण

व्यंकटेश वैष्णव , बीडस्वस्त धान्य दुकानांवर साखरेचे वाटप होत नसल्याचे जिल्ह्यात समोर आले आहे. दिवाळी ते दिवाळीच स्वस्त धान्य दुकानांवर साखर येत असल्याचे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी सांगितले. यावर प्रशासनाने आता पर्यंत कसलीच कारवाई केलेली नसल्याचे पहावयास मिळते.शासनाने गोरगरीबांना स्वस्तात धान्य मिळावे यासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. यामध्ये अन्नपूर्णा योजने अंतर्गत निराधारांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू आहे. याअंतर्गत जिल्ह्यात २ हजार ६०० लाभार्थी असून यांना अद्यापही पुरवठा विभागाकडून धान्य मिळालेले नाही. आॅगस्ट २०१४ चे साखरेचे नियतन मंजूर असून २० आॅगस्टपर्यंत साखरेचे वितरण करण्याच्या सूचना पत्रकात दिलेल्या आहेत. असे असताना देखील नागरिकांना साखर मिळालेली नाही. याबाबत ग्रामस्थांशी संपर्क साधला असता त्यांनी साखर मिळालेली नसल्याचे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.बहुतांश गावच्या ग्रामस्थांनी सांगितले की, २०१३ च्या दिवाळीलाच आमच्या गावात स्वस्त धान्य दुकानावर साखर आली होती. त्यानंतर आम्हाला साखर मिळालीच नाही. ग्रामस्थांनी असे उत्तर दिले असल्याने पुरवठा विभागाच्या धान्य वितरण करणाऱ्या यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.अगोदरच महागाई व दुष्काळ याने जनता होरपळली आहे. यातच जनतेसाठी येणाऱ्या स्वस्त धान्याचा देखील काळाबाजार होत आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी पुरवठा अधिकारी एस़ व्ही़ सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.दरम्यान, आलेली साखर नेमकी जाते कोठे ? याचे कोडे उलगडलेले नाही़ धान्याबरोबरच साखरेची विल्हेवाट लावणारी टोळीच कार्यरत झाली आहे़ अधिकारीच दलाल बनल्यामुळे गोरगरीबांच्या तोंडचा घास हिरावला जात असल्याचा आरोप अरिहंत नेहरु युवाचे ललित अब्बड यांनी केला आहे़