शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

वाटा भरा तरच अंबडकरांना पाणी

By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST

जालना: जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेतून लोकवर्गणीचा पंधरा कोटी रुपयांचा वाटा अदा केल्याशिवाय अंबडकरांना पाणी देऊ दिले जाणार नाही, असा इशारा माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिला.

जालना: जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेतून लोकवर्गणीचा पंधरा कोटी रुपयांचा वाटा अदा केल्याशिवाय अंबडकरांना पाणी देऊ दिले जाणार नाही, असा इशारा माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिला. या योजनेतून जालन्यापर्यंत पाणी पोहचावे म्हणून आपल्यासह पालिकेने सर्वार्थाने प्रयत्न केले आहेत. विशेषत: अनंत अडचणी असताना सुद्धा पालिकेने लोकवर्गणीचा पन्नास कोटी रुपयांचा वाटा उचला. पाठोपाठ विजेची थकित बिले अदा केली. देखभाल दुरुस्तीचा खर्च सुद्धा उचलला. त्याचबरोबर या योजनेतून पाणी मिळावे म्हणून अंबड पालिकेने केलेल्या प्रयत्नांना आम्हीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यासाठी लोकवर्गणीचा अंबडने पंधरा कोटींचा लोक वाटा उचलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु त्या संदर्भात अंबड पालिकेने एक छदामही रक्कम आदा केली नाही. अशी खंत गोरंट्याल यांनी व्यक्त केली. आता पाण्यासाठी अंबडकरांनी सुरु केलेल्या तोडफोडीसह संघर्षाची भाषा पूर्णत: गैर आहे. असे नमूद करीत पंधरा कोटींचा वाटा उचलावा. तेंव्हाच युटिलिटी कंपनीकडून व्यावसायिक दराद्वारे पाणी उपलब्ध केले जाईल असे ते म्हणाले. अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरणाच्या कामात कोणताही व्यत्यय येऊ नये किंवा जलवाहिनीची तोडफोड होऊन पाणी पळविले जाऊ नये म्हणून आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांना एक निवेदन सादर करणार आहोत. त्याद्वारे केंद्रासह जलवाहिनीस संरक्षण मिळावे अशी मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सदोष झाल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला. प्रिंटेड मतपत्रिका कर्तव्यावर असणाऱ्यांना वेळेत वाटप करण्यात आल्या नाहीत. शिवाय ४ हजार मतदारांची नावे दुबार आली आहेत. मयतांची नावे वेळेत वगळण्यात आली नाहीत, असे ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल हफिज, विनोद यादव, अरुण मगरे, राम सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)