शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

मराठवाड्यातील प्रकल्पांत फक्त ०.२३ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 14:31 IST

 जायकवाडीतही कमी जलसाठा

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा  मान्सून सुरू होऊन ३७ दिवस झाले आहेत.

औरंगाबाद : मान्सून सुरू होऊन ३७ दिवस झाले आहेत. मात्र, या ३७ दिवसांत दमदार पाऊस न झाल्यामुळे मराठवाड्यातील एकाही मोठ्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा होऊ शकलेला नाही. जायकवाडीचा मृतसाठादेखील अजून जिवंतसाठ्यात आलेला नाही. ११ मोठ्यांसह सर्व प्रकल्पांत ३७ दिवसांत ०.२३ टक्के पाणी आलेले आहे. गेल्या आठवड्यात सर्व प्रकल्पांत ०.४५ इतका जलसाठा जूनअखेरीस होता. तो आता ०.६८ टक्के झाला आहे. 

विभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. १२ दलघमी इतका उपयुक्त जलसाठा त्या प्रकल्पांत आहे. ७५ मोठ्या प्रकल्पांत २१.७४ दलघमी तर ७४९ लघुप्रकल्पांत २१.७२६ दलघमी साठा आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून ११ मोठ्या प्रकल्पांच्या क्षेत्रात पावसाने अपेक्षित अशी हजेरी लावली नाही. परिणामी विभागातील धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला नाही. मध्यम प्रकल्प क्षेत्रातही पावसाने दडी मारली आहे. लघुप्रकल्प हद्दीत काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु त्याचा साठा वाढण्यावर परिणाम झालेला नाही. यामुळे काळजी वाढली आहे.पाच वर्षांतील जायकवाडीची स्थिती 

मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा जायकवाडीतील पाणीपातळी खालावली आहे. २०१४ मध्ये ७० दलघमी, २०१५ मध्ये २८ दलघमी, २०१६ मध्ये धरण मृतसाठ्यात होते. २०१७ मध्ये ३९० दलघमी पाणी होते तर २०१८ मध्ये ४३९ दलघमी पाणी जायकवाडीत होते. यावर्षी धरण मृतसाठ्यात आहे. गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोदावरीचे पात्र दुथडी भरून वाहिले, मात्र त्याचा फार मोठा फायदा जायकवाडी क्षेत्राला झालेला नाही. 

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळRainपाऊस