शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जुन्याच ग्रामपंचायती नव्याने आराखड्यात

By admin | Updated: April 16, 2016 00:10 IST

संजय तिपाले ल्ल बीड स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने २०१६-१७ या वर्षासाठी तयार केलेल्या आराखड्यात शंभराहून अधिक ग्रामपंचायती जुन्याच असल्याची माहिती समोर आली आहे.

३२० गावांची निवड : १०७ कोटींचा निधी; ७९ हजारावर शौचालये बांधण्याचे उद्दिष्टसंजय तिपाले ल्ल बीडस्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने २०१६-१७ या वर्षासाठी तयार केलेल्या आराखड्यात शंभराहून अधिक ग्रामपंचायती जुन्याच असल्याची माहिती समोर आली आहे. शौचालय योजनेत सहभाग नोंदवून अर्धवट कामे करत पाणंदमुक्तीपासून दूर राहिलेल्या ग्रामपंचायतींना पुन्हा संधी दिल्याने नव्या ग्रामपंचायती वंचित राहण्याची शक्यता आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा शौचालयांचे उद्दिष्ट तिपटीने वाढले आहे. १०७ कोटी रुपये खर्च करुन सुमारे ७९ हजार ४११ शौचालये बांधण्यात येणार आहेत. गतवर्षी १०५ गावांचा वार्षिक आराखड्यात समावेश होता. ३३ हजार ८९ शौचालये बांधण्याचे लक्ष्य होते. हे लक्ष्य साध्य करुन बीड जिल्ह्याने मराठवाड्यात तृतीय तर राज्यात सातवे स्थान पटकावले. शौचालय योजनेत तळाशी असलेला बीड जिल्हा पहिल्यांदाच राज्यात पहिल्या दहा जिल्ह्यांत आपले स्थान निश्चत करु शकला आहे. तथापि, नव्या वर्षात शौचालय योजना अधिक गतिमान केली जाणार आहे. त्यासाठी आराखडा अंतिम करण्यात आला आहे. सर्वच गावे पाणंदमुक्त करण्याचा संकल्प पाणी व स्वच्छता विभागाने केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून १२५ शौचालयांच्या खोदकामांचे ‘मार्किंग’ केले आहे. ३२० गावांपैकी ४१ गावांत मग्रारोहयोतून तर उर्वरित गावांत स्वच्छता मिशनकडून कामे केली जातील. आराखड्याबाहेरची गावे शंभर टक्के पाणंदमुक्त झाल्यास ते अनुदानपात्र राहतील, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.तालुकानिहाय गावेअंबाजोगाई: २८, आष्टी : २६, बीड : ३५, गेवराई: ४४, शिरुर: १५, माजलगाव: ३०, केज: २४, परळी: २५, पाटोदा १०धारुर, वडवणी शंभर टक्के !धारुर व वडवणी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींचा आराखड्यात समावेश आहे. धारुर तालुक्यात ५१ तर वडवणी तालुक्यात ३२ ग्रामपंचायती आहेत.ज्या गावांत थोडीफार कामे झाली आहेत, त्या गावांना प्राधान्याने नव्या आराखड्यात संधी द्यावी, असे शासनानेच धोरण आहे. त्यानुसार जुन्या गावांना पुन्हा संधी दिलेली आहे. जी गावे स्वत:हून पुढे येतील, त्यांचे स्वागतच आहे. योजना प्रभावीपणे राबविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत.- नामदेव ननावरे, सीईओ, जि.प.