शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्टोबर ‘हिट’ अन् विजेचा लपंडाव

By admin | Updated: October 7, 2014 00:42 IST

कन्नड : तळपणारा सूर्य, वाढलेली उष्णता अन् डोळ्यांसमोर वाळत चाललेली पिके, यामुळे आधिच वैतागलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंपांचा सहारा घेतला,

कन्नड : तळपणारा सूर्य, वाढलेली उष्णता अन् डोळ्यांसमोर वाळत चाललेली पिके, यामुळे आधिच वैतागलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंपांचा सहारा घेतला, तर विजेचा लपंडाव, कमी दाबाने वीज, यात बळीराजा पुरता भरडून निघत आहे. त्यामुळे अगदी हातातोंडाशी आलेल्या पिकांची वाताहत आता बघवत नसल्याच्या प्रतिक्रीया शेतकरी हताश होऊन देत आहेत. आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापलेले आहे; मात्र शेतकऱ्यांचे तिकडे चित्त लागत नाही. एक तर यावर्षी सरासरी पर्जन्यमानाइतका पाऊस झालेला नाही, त्यामुळे बोटावर मोजण्याइतकीच धरणे पूर्ण क्षमतेने भरली. बहुतांशी जलसाठ्यांमध्ये वाढ होऊ शकली नाही. उशिरा आलेल्या पावसामुळे उशिरा पेरणी झाली. यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार, यात शंकाच नव्हती; तरीही काही ना काही पीक हातात पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी खर्च केला. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत बऱ्यापैकी पाऊस पडला; मात्र त्यानंतर पाऊस उघडला आणि वातावरण एकदमच बदलले. कडक ऊन पडू लागले. पिके ऊन धरू लागली. विहिरीत उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपसा करून पिकांना पाणी देण्याची धडपड शेतकऱ्यांनी सुरू केली; विजेच्या लपंडावामुळे या मनसुब्यावरही पाणी फिरले.