शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

थॅलेसीमियाग्रस्तांची संख्या सातशेच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:27 IST

औरंगाबाद जिल्ह्यात थॅलेसीमियाग्रस्त रुग्णांची संख्या सातशेच्या घरात गेली आहे. पती-पत्नी मायनर आजाराने ग्रस्त असतील तर जन्मणाऱ्या बालकास थॅलेसीमिया मेजर आजार होण्याचा धोका वाढतो.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात थॅलेसीमियाग्रस्त रुग्णांची संख्या सातशेच्या घरात गेली आहे. पती-पत्नी मायनर आजाराने ग्रस्त असतील तर जन्मणाऱ्या बालकास थॅलेसीमिया मेजर आजार होण्याचा धोका वाढतो. यासंदर्भात जनजागृतीची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

थॅलेसीमियाविषयी समाजात आजही फारशी जनजागृती नाही. या आजारासंदर्भात जनजागृती होण्यासाठी जगभरात दरवर्षी ८ मे रोजी थॅलेसीमिया दिन पाळण्यात येतो. या आजाराचे ‘मेजर’ आणि ‘मायनर’ असे दोन प्रकार आहेत. ‘मायनर’मध्ये आजाराची कोणतीही गंभीर परिस्थिती नसते.

रुग्णाला काही त्रासदेखील होत नाही. त्यामुळे अनेकदा ‘मायनर’ आजाराच्या रुग्णांचे निदानदेखील होत नाही; परंतु पती आणि पत्नी हे दोघेही ‘मायनर’ असल्यास त्यांच्यापासून जन्मणारे बालक हे थॅलेसीमिया मेजर असण्याचा सर्वाधिक धोका असतो. ‘थॅलेसीमिया मेजर’ या प्रकारात रुग्णांत लाल रक्तपेशींची निर्मिती होत नाही. त्यामुळे अशा बालकांना आयुष्यभर दर पंधरा अथवा दर महिन्याला रक्त देण्याची वेळ येते. त्यामुळे रुग्णांना आधार मिळतो. मात्र, वारंवार रक्त दिल्याने अन्य परिणामांनाही तोंड द्यावे लागते. वारंवार रक्त दिल्याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. त्यातून हृदय, यकृत आणि इतर अवयवांवर दुष्परिणाम होतो. त्यावर वेगळा उपचार घेण्याची वेळ येते. त्यातून आर्थिक संकटला तोंड द्यावे लागत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

दररोज १० ते १२ रुग्णघाटीत थॅलेसीमियाच्या २५० रुग्णांवर उपचार करण्यात येतात. रुग्णांना दर तीन आठवड्याला रक्त द्यावे लागते. त्यासाठी दररोज किमान १० ते १२ रुग्ण येतात. घाटीत थॅलेसीमिया डे केअरदेखील आहे. हा आनुवंशिक आजार आहे. दोन थॅलेसीमिया मायनर लोकांनी विवाह करू नये.-डॉ. प्रभा खैरे, विभागप्रमुख, बालरोग, घाटीसेंटरद्वारे उपचारजिल्हा सामान्य रुग्णालयात सप्टेंबर २०१८ मध्ये डे केअर सेंटर सुरू केले. तेव्हापासून या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात. याठिकाणी १४५ रुग्णांची नोंदणी झालेली आहे.- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सकलोहाचे प्रमाण वाढतेथॅलेसीमियाच्या रुग्णांचे हिमोग्लोबिन स्थिर राहत नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्याला रक्त द्यावे लागते. औरंगाबाद जिल्ह्यात साधारण ६५० रुग्ण आहेत. वारंवार रक्त दिल्याने लोहाचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदय, यकृतावर परिणाम होतो. त्यामुळे दररोज गोळ्या घेण्याची वेळ रुग्णांवर ओढावते.- कैलास औचरमल, अध्यक्ष, औरंगाबाद थॅलेसीमिया सोसायटी

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद