शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

आता परतीच्या पावसावर रबीची भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 5:09 PM

पावसाच्या गैरहजेरीत अळीचा खरिपावर डल्ला

करमाड : पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु औरंगाबाद तालुका अद्याप कोरडाच आहे. पाऊस न झाल्याने लष्करी अळीने खरिपाचे पीक फस्त केले असून, आता परतीच्या पावसावर बळीराजाची मदार अवलंबून आहे. पिण्याच्या पाण्यासाठी, रबी हंगामातील पिके, फळपिके ब पशुधन वाचवण्यासाठी परतीच्या काळात वरूण राजाने कृपा करावी, अशी आशा बळीराजाला लागून राहिली आहे.

पावसाळा अखेरच्या टप्प्यात असून, अद्याप विहिरी, नदी-नाले, धरणे कोरडी पडलेली आहेत. मात्र, परतीचा पाऊस येईल या आशेवर बळीराजा रबीची स्वप्न रंगवत आहे. औरंगाबाद तालुक्यावर अद्याप एकाही मोठ्या पावसाने हजेरी लावली नसल्याने सुखना, लहुकी, बाबूवाडी सारखे पाझर तलाव मृतसाठ्यातच आहेत.

छोट्या-मोठ्या नदी नाल्यांना पाणी वाहिले नसल्याने विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. शिवाय मागील वर्षी सुरु झालेली पाणीटंचाई अद्याप संपलेली नाही. सप्टेंबर महिना आर्धा संपत आला तरी एकही दमदार पाऊस झाला नाही. बाजरी व मकावर लष्करी अळीने हल्ला चढवला.

या अळीमुळे उत्पन्न तर सोडा चाराही होण्याची आशा मावळली आहे. शिवाय कमी पाण्यामुळे कपाशीला फक्त 20 टक्के कैऱ्यांची उगवण झालेली आहे. कपाशी पिकातून खर्च सुद्धा निघणार नाही, अशी परिस्थिती आहे.

दोन दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागांत पावसाचा शिडकावा सुरू झाल्याने किमान परतीच्या पाऊस जोरदार हजेरी लावेल या आशेवर बळीराजाचे रबीचे स्वप्न रंगवत आहे. या पिकातून जनावरासाठी चारा तर होतोच शिवाय गहु, ज्वारी हे धान्यही मिळते.प् ारंतु अद्याप तरी परतीच्या पावसाकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagricultureशेती